ITR उशिरा दाखल केला तरीही मिळणार परतावा
ITR उशिरा दाखल केला तरीही मिळणार परतावा
मुंबई - लोकसभेत काल मंजूर झालेल्या नवीन आयकर विधेयकात एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन नियमानुसार, आता उशिरा ITR सादर करणारे करदाते त्यांच्या अतिरिक्त कापलेल्या कराचा परतावा देखील मागू शकतात. new income tax bill च्या पहिल्या आवृत्तीचा अभ्यास केल्यानंतर संसदीय समितीने सरकारला त्यात २८५ सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. असे म्हटले जाते की करदात्यांच्या हिताचा विचार करून सरकारने बहुतेक शिफारशी स्वीकारल्या आहेत. पुढील वर्षी १ एप्रिलपासून नवीन आयकर नियम लागू केले जातील
भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील ३१ सदस्यीय संसदीय समितीने २१ जुलै रोजी सरकारला त्यांच्या शिफारसी सादर केल्या. यानंतर, सरकारने दुरुस्तीनंतर ११ ऑगस्ट रोजी लोकसभेत आयकर विधेयक २०२५ ची नवीन आवृत्ती सादर केली. नवीन आयकर कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.
आयकर विधेयक, २०२५ च्या नवीन आवृत्तीनुसार, आयकर विवरणपत्र (ITR) उशिरा दाखल केले तरीही परतावा दिला जाईल. याचा अर्थ असा की करदात्याने शेवटच्या तारखेनंतर रिटर्न दाखल केले तरीही त्याला परतावा मिळेल. आयकर विधेयक २०२५ च्या पहिल्या आवृत्तीत उशिरा ITR दाखल केल्याबद्दल परतावा न देण्याची तरतूद होती. कर तज्ञांचा यावर आक्षेप होता. सरकारने नवीन आवृत्तीत हा नियम दुरुस्त केला आहे. करदात्यांच्या हितासाठी हा एक मोठा बदल आहे.
विलंबित रिटर्न दाखल केल्यावर दंड आणि करावरील व्याज भरावे लागते. पूर्वीच्या आवृत्तीत शेवटच्या तारखेनंतर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना परतावा मिळणार नाही अशी तरतूद होती.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya