मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार….

विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार….

मुंबई - विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे अर्ज भरायच्या आजच्या शेवटच्या दिवशी ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी एकूण १९ अर्ज भरले, यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी अर्ज भरला. काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी दिली असून त्यांनीही आज अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांनीही अर्ज भरला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या सर्व उमेदवारांनी आज अर्ज भरले.

विधानसभा सदस्यांमधून यापैकी ११ सदस्य विधान परिषदेवर निवडून जाणार आहेत , साधारणपणे तेवीस ते पंचवीस मतांचा कोटा एका उमेदवारासाठी आवश्यक असणार आहे, त्यानुसार सध्या विधानसभेत असलेल्या संख्याबळानुसार भाजपचे पाच , शिवसेना , राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक सदस्य निवडून जाणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उबाठा आणि काँग्रेस कडील अतिरिक्त मते यातून आणखी एक असे अकरा जण निवडून येऊ शकतात.

मात्र शिवसेना उबाठा पक्षाने त्यांच्याकडे चौदा आमदार असतानाही मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवले असून नार्वेकर यांचे एकनाथ शिंदे, फडणवीस यांच्याशी असलेले मधुर संबंध यासाठी वापरायचे ठरविल्याचे दिसत आहे. शेकापच्या जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांच्याकडे ही तेरा , चौदा मते आहेत. काँग्रेसकडे असलेली आपला उमेदवार सोडून कोट्याबाहेरची मते कोणाकडे जातात यावर जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यापैकी एक विजयी होतात ते पहावे लागेल.

राजकारणात एक आणि एक दोन असे गणित कधीच नसते , याचा अनुभव यापूर्वी अनेक वेळा आला असून गेल्या वेळी स्वतःकडे मते नसताना ही भाजपाने प्रसाद लाड यांना निवडून आणलेच होते. जयंत पाटील ही या खेळात माहीर आहेत त्यामुळे कोण कोणाची मते फोडतो यावरच अकरावा उमेदवार विजयी होणार आहे.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट