मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नेत्यांचा ओघ मविआकडे

 नेत्यांचा ओघ मविआकडे 

                   राजकारणात केव्हा, कधी, कोणता बदल होईल हे नक्की सांगता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांचा ओघ महाविकास आघाडीकडे चालल्याचे दिसत आहे. राजकारणासोबत सहकार क्षेत्रात ठसा उमटलेल्या महायुतीतील काही नेत्यांनी कोल्हापुरात महाविकास आघाडीत प्रवेश करण्याची घाई चालवली आहे. गेले काही वर्ष महायुतीकडे झुकत असलेला राजकीय प्रवेशाचा रोख आता महाविकास आघाडीच्या दिशेने झेपावू लागला आहे. समरजित घाटगे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील , राहुल देसाई , सुरेश पाटील आदी नेत्यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. घाटगे यांनी सर्वात आधी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी पटकावून याची सुरुवात केली आहे. कोल्हापूर परिसरात महा विकास आघाडीकडे जाणाऱ्या नेत्यांची गर्दी वाढू लागली आहे.

               देशामध्ये आणि पाठोपाठ राज्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले आहे. त्याच्या काही काळ पूर्वीपासून तत्कालीन युतीमध्ये प्रवेश करण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची  रांग लागली होती. हे चित्र अगदी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला जबर फटका बसला तर महाविकास आघाडीची सरशी झाली होती. तेव्हापासून पक्ष प्रवेशाचा ओघ महायुतीकडून महाविकास आघाडीकडे राहिला असल्याचे दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्यात हे प्रकर्षाने दिसून येऊ लागले आहे. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की, महायुतीकडून अनेक नेते महा विकास आघाडीत प्रवेश का करत आहेत ? तर याला कारणीभूत आले तो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकाल ! मतदारांचा कल बदलेल तसे अनेक नेते कुठे जायचे याचा निर्णय घेत असल्याचे दिसतात.

                 विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवणे हे प्रत्येक नेत्याचे ध्येय  असल्याचे दिसत आहे. कागलमध्ये उपमुख्यमंत्री शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केल्यावर महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता पूर्णतः मावळल्यानंतर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी नुकतेच भव्य शक्तीप्रदर्शन करीत शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. ते पवारांच्या पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित झाले असून त्यांना निवडून आणण्यासाठी पवारांनी ताकद पणाला लावण्याचा निर्धार केला आहे. नेत्यांना अशाप्रकारे जुने संबंध असलेल्या राजकीय पक्षांची आठवण येत आहे.

                समरजित घाटगे हे राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारसदार आहेत. श्रीमंत शाहू महाराज यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळवली आणि ते खासदार झाले. पाठोपाठ घाटगे राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवून विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत. घाटगे हे छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यासह राजे बँक, दूध संघ अशा प्रमुख संस्थांच्या शाहू सहकार उद्योगाचे प्रमुख आहेत. दशकभरापूर्वी उभय काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेले सहकारातील नेते भाजपाकडे जात होते. ते आता मविआकडे येऊ लागल्याचे यातून दिसू लागले आहे. पाठोपाठ राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचेही मविआकडून अंतर्गत उमेदवारी मिळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर परिसरातील काही नेते महायुतीकडे पाठ फिरवू लागले आहेत. आपापले सहकार उद्योग सांभाळण्यासाठी सोबत सहकार क्षेत्रातील मित्रांची आवश्यकता असते. तसेच काहीसे कोल्हापूर परिसरातील नेत्यांचे होत आहे.

                राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील आहेत. व राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असून त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी निश्चित केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले आहे. याच मतदारसंघातील युवा नेते भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही मविआच्या दिशेने नवी राजकीय वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भुदरगड तालुका खरेदी विक्री संघाचे काम चालते. ते बिद्री साखर कारखान्याचे संचालकही आहेत. त्यांचे वडील बजरंग देसाई हे काँग्रेस कडून या मतदारसंघात आमदार झाले होते. इचलकरंजी मध्ये मेट्रो हायटेक पार्क, मारुती सहकार उद्योग समूह, मराठा आरक्षण क्रांती समितीचे संस्थापक सुरेश पाटील यांनीही भाजप पासून बाजूला जाऊन तुतारीची उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सहकारातील एकेक बडे नेते महायुतीची साथ सोडून मविआमध्ये पुन्हा सक्रीय होऊ लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मविआकडे उमेदवारीसाठी राजकीय नेत्यांनी रांग लागल्याचे दिसत आहे.

रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट