NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

Reliance Jio कडून मुंबईतील ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवा

Reliance Jio कडून मुंबईतील ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवा

मुंबई - दोन महिन्यांपूर्वी इंटरनेट सेवेचे दर वाढवल्यामुळे ट्रोल झालेली Reliance Jio आता ग्राहकांना खूश करण्याता प्रयत्न करत आहे. Reliance Jio मुंबईतील ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवा देणार आहे, याची माहिती कंपनीनं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून दिली आहे. मंगळवारी भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या नेटवर्कमध्ये बिघाड आला होता, त्यामुळे मुंबईत कॉलिंगसह इंटरनेट पर्यंत सर्व सेवा काही काळ बंद पडल्या होत्या. मंगळवारी नेमका काय प्रकार घडला हे मात्र जिओनं सांगितलं नाही, परंतु नेटवर्क गेल्यामुळे ज्या ग्राहकांना त्रास झाला त्यांना दोन दिवसांचा कॉम्प्लिमेंटरी प्लॅन देण्याची घोषणा कंपनीनं केली आहे.

याआधी देखील अनेकदा अश्याप्रकारे जिओ नेटवर्क बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. एक्स (ट्विटर) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जिओ युजर्सनी आपला राग व्यक्त केला, ज्यात अलीकडेच करण्यात आलेल्या दरवाढीचा देखील उल्लेख पाहायला मिळाला. कंपनीनं त्वरित कारवाई केली आणि काही तासांमध्ये पुन्हा एकदा सेवा दुरुसत केली आणि आता ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवा देऊन नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

जिओने मेसेज मध्ये लिहलं आहे की, “ प्रिया जिओ युजर्स, तुम्हाला दर्जेदार सेवा देण्यास आम्ही प्राधान्य देतो. परंतु दुर्दैवाने मंगळवारी सकाळी सेवांमध्ये अडथळा आला. तुमच्या नंबरवर दोन दिवसांची अमर्याद प्लॅन निशुल्क लागू करण्यात आला आहे. हा निशुल्क प्लॅन लागू होताच आपोआप चालू होईल. तुम्हाला सेवेचा चांगला अनुभव येण्यास आम्ही प्राधान्य देतो. जिओकडून सप्रेम भेट.”


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट