मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

चकमकीत मेजरसह 4 जवानांना वीरमरण

4 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीर : उत्तर काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये लष्कराचे एक मेजर आणि 3 जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत या 4 जणांना वीरमरण आलं आहे. या चकमकीत एकूण 8 दहशतवादी होते. त्यातल्या 4 दहशतवाद्यांना आपल्या जवानांनी कंठस्नान घातले आहे. 

गुरेज हे एलओसीजवळ आहे. श्रीनगरपासून 123 किलोमीटरवर गुरेज सेक्टर आहे. काल रात्री लष्कराचा एलओसीवर संशयित हालचाली दिसल्या. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. लौसर, सरदारी, नुशेरानर आणि दुरमत या पाकव्याप्त काश्मीरमधल्या गावांमधून दहशतवादी आपल्या हद्दीत घुसले. मेजर केपी राणे, हवलदार जामी सिंग, हवलदार विक्रमजीत, रायफल मॅन मनदिप अशी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत. काश्मीरच्या या चकमकीत या 4 जवाणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे आता भारतील सैन्य याचा बदला घेण्याच्या पवित्र्यात कारवाई करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारपासून पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर वारंवार गोळीबार सुरू होता. यावेळी, सीमावर्ती भागात भारतातील 8 दहशतवादी घुसखोरी करताना आढळले आहे. जेव्हा भारतीय सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला, तेव्हा त्यांनीही गोळीबार करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत. गोळीबारामध्ये एक मेजर असत शहीद माहिती आहे.  या ऑपरेशनमध्ये लष्कराच्या 36 राष्ट्रीय रायफल्स आणि  9 ग्रेनेडियर्स यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. लष्करी माहिती नुसार, अजूनही अनेक दहशतवादी या क्षेत्रात लपलेले आहेत. असे म्हटले जाते की 2003च्या कराराच्या पहिल्यांदाच या क्षेत्रात पाकिस्तानसाठी मोर्टर्स वापरले जात आहेत. पाकिस्तानाच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी  भारतीय सैनिक देखील सतत गोळीबार करत आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट