मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू

कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू

गॅलरी  

रत्नागिरी - रेल्वे ट्रॅकवर आलेली दगड माती काढण्याचे काम अखेर आज सायंकाळी पूर्ण झाले असून सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथील ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले आहे यामुळे रेल्वेची वाहतूक तब्बल चोवीस तासांच्या नंतर सुरू करण्यात आली आहे.

खेडनजिक नातूवाडी बोगद्याजवळ कोसळलेली दरड हटवण्याचे काम पावसामुळे चिखल झाल्यामुळे कठीण झाले होते , तो काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या दरम्यान

रखडलेल्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेच्या मदतीला एसटी धावली.

विविध स्थानकांवर रखडलेल्या गाड्यांमधील प्रवाशांना मुंबई येथे सोडण्याकरता उपप्रबंधक यांनी केलेल्या मागणी नुसार एसटी बस पुरवण्यात आल्या. त्यामध्ये रत्नागिरी स्टेशन 40 बस, चिपळुण स्टेशन 18 बस आणि खेड स्टेशन 10 बस तर कणकवली येथून 12 बसेस अशा एकूण 80 बस सोडण्यात आल्या.खेड दिवाणखवटी येथे कोकण रेल्वे मार्गावर माती आल्यामुळे कोकण रेल्वे मार्ग बंद झाला होता. मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चिखलयुक्त माती रेल्वे ट्रॅक वर आली. त्यामुळे हा मार्ग सुरू होण्यासाठी विलंब लागला. यामुळे यापूर्वी रद्द केलेल्या काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करून त्या सोडण्यात आल्या. यामध्ये 11100 मडगाव एलटीटी मडगावहून सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी . 12052 मडगाव सीएसटीएम जनशताब्दी एक्सप्रेस मडगावहून रात्र आठ वाजून तीस मिनिटांनी . 20112 मडगाव सीएसटीएम कोकण कन्या एक्सप्रेस मडगावहून आज रात्र अकरा वाजून 30 मिनिटांनी सुटेल तर 11004 सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस सावंतवाडीहून रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी सुटेल.

विविध स्टेशनवर गेली दहा ते बारा तास उभ्या असलेल्या गाड्यांमधील प्रवाशांना काही ठिकाणी भोजन आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व स्टेशन वरील उपाहारगृहांना सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कणकवली येथे रखडलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी 513 प्रवाशांसाठी 12 एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट