मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कर्नाळा बँक ठेविदारांचे रास्ता रोको आंदोलन

कळंबोली ः कर्नाळा बँक घोटाळ्याने हजारो ठेवेदारांचे लाखो रुपये अडकले आहेत. या ठेवीदारांनी मंगळवारी संघर्ष समितीच्यावतीने सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनातून राज्य आणि केंद्र शासनाने धडा घेतला नाही तर मंत्रालय, आरबीआय बँकवर चाल करू, असा इशारा आंदोलनातून देण्यात आला.

कर्नाळा बँकेत 543 कोटींचा घोटाळा झाल्याचे रिझर्व्ह बँकेमुळे उघडकीस आले आहे. पनवेल संघर्ष समितीने व ठेविदारांनी सक्त संचनालयाकडून (ईडी) मुख्य आरोपी, माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना अटक करायला लावली. गेल्या दिड वर्षात विविध स्तरावर पत्रव्यवहार, बैठका, ऑनलाईन मिटिंग घेवून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि सहकार्‍यांनी ठेविदारांचा टोहो सरकारच्या कानात गुंजत ठेवला होता. आज रास्ता रोकोसाठी हजारो ठेविदार उत्स्फूर्तपणे कडू यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून बँक लुटारूंच्या नावाने शिमगा करत होते. महाडपासून खारघर आणि रसायनीपासून उरण, पनवेल कळंबोली, कामोठे, वहाळ, गणेशपूरी, ओवळे येथील ठेविदार लक्षणिय संख्येने उपस्थित होते. या आंदोलनातून राज्य आणि केंद्र शासनाने धडा घेतला नाही तर मंत्रालय, आरबीआय बँकवर चाल करू, असा इशारा देण्यात आला. ठेविदारांचे पैसे परत मिळाल्याशिवाय गप्प राहणार नाही अशी भुमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी कांतीलाल कडू, तेजस डाकी, रत्ना बडगुजर, प्रतिमा मुरबाडकर, विजय मेहता, उरणकर, मुणोथ, भूषण सांळुके, कृष्णा भगत, अनुराज पवार यांच्यासह अनेक ठेविदारांनी अंतःकणापासून भाषणातून व्यथा मांडल्या. कांतीलाल कडू यांनी आपल्या धारदार शैलीत मुख्य आरोपी विवेकानंद पाटील, राज्य शासन, केंद्र शासन, गृहखाते, सीआयडी, सहकार खात्याची लक्तरे वेशीवर टांगली. तसेच कर्नाळा बँक लढ्याला मिळत असलेले यश लाटू पाहणार्‍या आ. प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्यावरही आसूड ओढला. कळंबोली द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करीत असताना कांतीलाल कडू यांच्यासह सहकार्‍यांना पोलीसांनी अटक करुन त्यांची सूटका केली. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट