NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लवकरच करता येणार कर्जत – पनवेल थेट रेल्वे प्रवास

लवकरच करता येणार कर्जत – पनवेल थेट रेल्वे प्रवास

मुंबई - मुंबई-कर्जत-पनवेल असा थेट प्रवास लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल कमी होतील आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग ठरणारा कर्जत-पनवेल रेल्वे कॉरिडॉर लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. जवळपास 29.6 किमी लांबीच्या या मार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-3 (MUTP-3) अंतर्गत हाती घेतलेल्या या प्रकल्पासाठी 2,782 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.

हा मार्ग डोंगराळ प्रदेशातून जात असल्याने यासाठी वावरले, नधाळ आणि किरवली येथे तीन बोगदे तयार करण्यात आले आहेत. तिन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय 47 पुलांपैकी 29 छोटे आणि 6 मोठे पूल पूर्ण झाले आहेत.

या मार्गावर पनवेल, मोहोपे आणि कर्जत अशी तीन महत्त्वाची स्थानके असतील. दोन जुन्या स्थानकांना नव्या मार्गिकेशी जोडण्यात आले आहे, ज्यामुळे उपनगरीय रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतुकीत मोठा बदल होईल आणि स्थानिक तसेच प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल.

नवीन रेल्वे मार्ग तयार झाल्याने कर्जत आणि पनवेलमधील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच कमी होणार नाही तर मुंबईच्या उपनगरातील वाहतुकीवरील ताण देखील काही प्रमाणात कमी होईल.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट