मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

दरवर्षी गाव जलमय होत असल्याने डुंगी ग्रामस्थ आक्रमक

सिडकोच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ; आंदोलनाचा इशारा

पनवेल ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सिडकोमार्फत सुरु आहे. सिडकोच्या चुकीच्या नियोजनामुळे दरवर्षी डुंगी गावात पाणी शिरते. याचा फटका ग्रामस्थांना बसत असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. गेल्या चार दिवस पडणार्‍या मुसळधार पावसाने डुंगीगाव जलमय झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार, सिडको आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच इतर मान्यवरांची मंगळवारी (दि. 20) प्रांत कार्यालयात बैठक झाली.

विमानतळासाठी सिडकोने परिसरातील गावांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. तसेच परिसरातील नदीचा प्रवाह वळविला असल्याने पावसाचे पाणी जाण्यास पर्यायी मार्ग नसल्याने डुंगी गाव आजच्या घडीला जलमय झाले आहे. सिडकोच्या चुकीच्या नियोजनामुळे दरवर्षी गावात पाणी साचत आहे. गेले चारवर्षापासून ही परिस्थिती असूनही कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. तसेच नुकसान भरपाईही दिली जात नाही. विमानतळासाठी सिडकोने नदीचा नैसर्गिक प्रवाह वळविला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी पर्यायी जागाही उपलब्ध नसल्याने नदीसह पावसाचे पाणी डुंगी गावात शिरते. त्यामुळे गाव दरवर्षी जलमय होते. सतत दोन दिवस पडत असलेल्या पावसाने गावात पुरसदृश्य परिस्थिती उद्धवली आहे. पाणी उपसा करण्यासाठी सिडकोने 12 मोटर व सेक्शन पंप लावले आहेत. मात्र तरीही पाणी जात नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. याची दखल घेत मंगळवारी जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार विजय तळेकर, सिडकोचे भूमी व भूमापन अधिकारी माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांच्यासोबत ग्रामस्थांच्या वतीने रामशेठ ठाकूर, उपमहापौर जगदिश गायकवाड, 27 गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांची पदाधिकार्‍यांसह बैठक झाली.

या वेळी ग्रामस्थांच्या मागण्या जोरकसपणे मांडण्यात आल्या. या संदर्भात 23 जुलै रोजी पुन्हा बैठक होणार आहे. त्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. या वेळी 27 गाव कृती समिती प्रेम पाटील, कायदेशीर सल्लागार राहुल मोकल, रुपेश धुमाळ, किरण पवार, कांचन घरत, सल्लागार प्रमुख महेंद्र पाटील, सरपंच बाळाराम नाईक, कार्याध्यक्ष सुनील म्हात्रे यांच्यासह डुंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट