मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पनवेलमध्ये पुरसदृश परिस्थिती

पनवेल ः पनवेल परिसरात दुसर्‍या दिवशी सोमवारी देखील पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पनवेल शहर, खांदा कॉलनी, कळंबोली,खारघर आदींसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.मागील 24 तासात 284 मिमी पावसाची नोंद एकट्या पनवेल तालुक्यात करण्यात आली आहे. 

सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने सायन पनवेल महामार्ग,कळंबोली मुंब्रा हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने गाड्या पाण्यात अडकल्या आहेत. गाढी आणि कासाडी या दोन्ही नद्या दुथडी वाहत आहेत. सखल भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना घडत आहेत. कळंबोली वसाहत तुंबली असून बैठ्या घरांमध्ये पाणी घुसून अनेकांचे नुकसान झाले. 

आपत्ती व्यवस्थापनाची ऐसी की तैसी
कळंबोली वसाहत भरल्यानंतरही ना सिडको दिसली ना महापालिका, त्यामुळे कळंबोलीकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. पाणी साचल्यानंतर त्याला वाट करून देण्याच्या अनुषंगाने दोन्ही यंत्रणांकडून कोणत्याही उपायोजना केल्या गेल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे कळंबोलीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला.
वरवरची नालेसफाई पावसाच्या पाण्यात बुडाली
कळंबोली वसाहतीमध्ये सिडकोने वरवरची नालेसफाई केली. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या अनुषंगाने याकडे अधिकार्‍यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबून ठीकठिकाणी पाणी साचले. जनजीवन विस्कळीत झाले. याला नेमके जबाबदार कोण, ही सगळी नुकसानभरपाई सिडको देणार आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट