NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

25 दिवसांत 20 हजार जणांवर कारवाई

रायगड पोलिसांनी केली 50 लाखांची दंडवसुली

अलिबाग : रायगड पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. गेल्या 25 दिवसात करोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 20 हजार जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या बेजबाबदार नागरिकांकडून तब्बल 50 लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. दोन हजारपेक्षा अधिक लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या करोनाचे 13 हजार सक्रीय रुग्ण आहेत. यातील तीन हजार लोकांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सुविधांवरचा ताण प्रचंड वाढला आहे. प्राणवायू, रेमडेसिविर औषधांचा तुटवडा राज्यभरात जाणवत आहे. नागरिकांना करोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. मात्र यानंतरही काही नागरिकांचा बेजबाबदारपणा सुरुच आहे. सार्वजनिक मुखपट्टीचा वापर न कऱणे, आंतर नियमांचे उल्लंघन करणे, संचारबंदी आणि जमावबंदीच्या आदेशाची पायमल्ली करणे यासारखे प्रकार सुरुच आहेत. पोलिसांनी बेजबाबदार नागरिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. आगंतूक फिरणार्‍याची धुलाई न करता दंडात्मक कारवाईकडे पोलिसांचा कल आहे. 1 ते 25 एप्रिल या कालावधीत मुखपट्टी विना फिरणार्‍या सहा हजार 317 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 13 लाख 99 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. संचारबंदी आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी 456 गुन्हे दाखल करण्यात आले. यातील 22 गुन्हे न्यायालयात शाबित झाले. त्यात 44 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर 434 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. निर्बंधाच्या काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 13 हजार 599 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 40 लाख 18 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांकडून शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे आणि नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. मात्र लोकांकडून नियमांचे उल्लंघन सुरु असल्याने पोलिसांकडून व्यापक कारवाई सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे, कारण नसतांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट