अंबरनाथमध्ये भाजपसोबत युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचं निलंबन,
अंबरनाथमध्ये भाजपसोबत युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचं निलंबन,
मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्रित आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये भाजपने काँग्रेससोबत हातमिळवी करत शिवसेना शिंदेगटाला सत्तेतून बाहेर ठेवले. काँग्रेसमुक्त भारतच्या घोषणा देणाऱ्या अंबरनाथमध्ये भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला. काँग्रेसने पक्षाच्या १२ नगरसेवकांचे निलंबन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप, काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने मिळवून अंबरनाथ विकास आघाडीची स्थापना केली. भाजप आणि काँग्रेस एकत्रित आल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून नगरसेवकांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंबरनाथच्या प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांचे कॅाग्रेसमधून निलंबन करण्यात आले. काँग्रेस चिन्हावर निवडून आलेल्या १२ सदस्यांनीअंबरनाथ नगरपालिकेत भाजपासोबत परस्पर युती केली होती. भाजपासोबत युतीची घटना पक्षशिस्तीचा भंग करणारी असल्याने काँग्रेसची या सर्व सदस्यांविरोधात कारवाई केली.
काँग्रेस पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांवर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार अंबरनाथची ब्लॅाक काँग्रेस कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता अंबरनाथ नगरपरिषदेत फेर निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईमध्ये अंबरनाथमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. याची फक्त अंबरनाथमध्ये नाही तर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant