उपराजधानीत श्वानांचा सुळसुळाट, १० पट वाढली संख्या
उपराजधानीत श्वानांचा सुळसुळाट, १० पट वाढली संख्या
नागपूर - देशात सर्वत्रच गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. राजधानी नागपूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या सहा महिन्यांत एकट्या नागपूर शहरात श्वानदंशाच्या 5 हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतीच शहरातील त्रिमूर्ती नगर परिसरात एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर 4 ते 5 मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ती मुलगी गंभीर जखमी झाली आणि रक्तबंबाळ झाली.
या प्रश्नाबाबत गेल्या १९ वर्षांपासून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर एक जनहित याचिका प्रलंबित आहे. या याचिकेवर न्यायालयाने वेळोवेळी अनेक आदेश दिले आहेत, मात्र तरीही कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारी समस्या कमी होण्याऐवजी दहा पटींनी वाढली आहे. याचिकेतील याचिकाकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते विजय तालेवार सांगितलं की, ‘2008 साली नागपूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या 10 हजार होती, ती आज 2025 मध्ये 1 लाखाहून अधिक झाली आहे. नसबंदीचे काम योग्य प्रकारे झाले असते, तर कुत्र्यांची संख्या दहा पटींनी कशी वाढली, असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. यावरून प्रशासनाला उच्च न्यायालयाचीही भीती राहिली नाही, असे ते म्हणाले. हा खटला पुढील 25 वर्षे चालेल, याची अधिकाऱ्यांना खात्री असल्यामुळे ते आदेशांची अंमलबजावणी करत नाहीत,’ असा आरोप त्यांनी केला.
कुत्रा चावल्यास कोणत्या कलमाखाली एफआयआर दाखल करावा, याची पोलिसांना माहिती नाही, असे तालेवार यांनी सांगितले. प्राणीमित्र म्हणवणाऱ्या संघटनांवरही त्यांनी टीका केली. त्या संघटना केवळ आक्षेप घेतात, पण जबाबदारी घेत नाहीत. शहरातील सर्व श्वानप्रेमींनी मोकाट कुत्र्यांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
दिल्ली मनपा दरमहा करणार १० हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण
राजधानीतील भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे निराकरण करण्याच्या एका जलद योजनेचा भाग म्हणून, दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) सर्व १२ नागरी झोनमध्ये कुत्र्यांसाठी निवारागृहे बांधणार आहे आणि रहिवाशांना भटक्या प्राण्यांची तक्रार करण्यासाठी एक समर्पित हेल्पलाइन सुरू करणार आहे. दरमहा सरासरी १० हजार कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण केले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांना निवारागृहांमध्ये स्थलांतरित करण्याच्या पूर्वीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सुनावणीवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. गुरुवारी, खंडपीठाने टिप्पणी केली की दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांशी संबंधित “संपूर्ण समस्या” ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या “निष्क्रियते”चा परिणाम आहे ज्यांनी “काहीही” केले नाही.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर