मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पुरस्कार चैतन्यमय उद्योमशीलतेचा...


चैतन्य* या अस्सल मालवणी भोजनाचा आस्वाद देणाऱ्या दादर मुंबई येथील भोजनगृहाच्या सर्वेसर्वा सुरेखा वाळके यांचा तीन हजाराहून अधिक उद्योजकांच्या उपस्थितीत माटुंगा येथील षणमुखानंद सभागृहात महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते कर्तबगार महिला म्हणून महाराष्ट्रीयन उद्योजक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सुरेखा वाळके यांच्या या भोजनगृहात अनेक नामवंत कलाकार, साहित्यिक,राजकारणी यांची वर्दळ असते कारण येथल्या पदार्थांना असलेला स्वादिष्ट तडका!आणि अर्थातच त्यांची सौजन्यशील सेवा... 

वाळके यांनी व्यवस्थापन कौशल्य वापरून अनेक सुधारणा करून ह्या व्यवसायाला नावारूपाला आणले आहे .

*चैतन्य* मध्ये रुचकर भोजनाचा सहकुटुंब मित्रमंडळींसह आस्वाद घेणे हा स्टेटस सिम्बॉल ठरत आहे.

मी उद्योजक होणारच! या मराठी उद्योजकांना व्यासपीठ देऊन प्रोत्साहन देणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थेच्या वतीने तीन हजाराहून अधिक उद्योजकांना प्रथमच एका व्यासपीठावर आणून मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत भव्य दिव्य असा शाही सोहळा संपन्न झाला.

यावेळी पुरस्कार विजेत्या सुरेखा वाळके यांनी उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट