‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मणक्यातील चकती संबंधित विकार आणि उपचार

धावपळीच्या जीवनपद्धतीमुळे शारिरिक विकारातही वाढ होत चालली आहे. असा एक विकार म्हणजे मणक्यातील चकती सरकणे यालाच स्लीप डिस्क असेही म्हणतात. या विकाराची व त्यावरील आयुर्वेदीय उपचाराची आज आपण माहिती घेऊया.

मणक्यातील चकती म्हणजे काय?

आपल्या पाठीचा कणा अनेक मणक्यापासून तयार होत असतो. या मणक्यामधील पोकळीतून मज्जारज्जू जात असतो. हे मणके एकावर एक असे बसवलेले असतात. या दोन मणक्याच्या मुख्य भागाच्या मधोमध जी चकती असते तिला इंटरव्हल डिस्क असे म्हणतात. विविध आघातांचे शोषण करून पाठीच्या कण्याचे रक्षण करण्याचे मुख्य काम ती करत असते. याचबरोबर दोन मणक्यामधील हालचाल ही सुलभ करत असते. चकतीचा मध्यवर्ती भाग हा स्पंजाप्रमाणे मऊ तर कडेचा थोडा भाग कठीण असतो. ही चकती दोन कठीण स्वरूपाच्या प्लेटनी आच्छादित असतो. व या प्लेटवर व खाली दुसर्‍या मणक्याशी जोडलेल्या असतात. स्वाभाविक अवस्थेत ज्यावेळी आपण पुढे वाकतो त्यावेळी नेहमीच चकती थोडीशी मागे मज्जारज्जूच्या पोकळीत थोडीशी सरकत असते.

चकती सरकण्यामागची कारणे -

बहुतांश वेळा कोणत्याही कारणाने होणारा आघात हे चकती सरकण्याचे मुख्य कारण असते. अशा वेळी अचानक उत्पन्न झालेल्या तीव्र ताणामुळे चकतीच्या मागील स्नायुवर परिणाम होतो आणि चकती सरकते. पुढे वाकून सतत काम करणार्‍या व्यक्तीत हा प्रकार सहजतेने घडतो. काही वेळा सतत येणारा शारिरीक अथवा मानसिक ताण यामुळेही चकती सरकते. वार्धक्यामुळे चकतीची तन्य शक्ती कमी होते. अशी दुर्बल कमजोर चकती शरीराचा ताण सहन करण्यास असमर्थ ठरून सरकू शकते. अशा वेळी मोठ्या आघाताची नसते. थोड्या प्रकरचा वाढलेला ताण अथवा किरकोळ आघातानेही वार्धक्यात चकती सरकल्याचे आढळते. कंबरेच्या चौथ्या व पाचव्या मणक्यातील पाचव्या व माकड हाडातील चकती सरकण्याचे प्रमाण  सर्वात जास्त आढळत तसेच मानेच्या 5 आणि 6 आणि 7 व्या मणक्यातील चकतीही अनेकदा सरकल्याचे आढळून येते.

चकती सरकल्याची लक्षणे -

चकती सरकल्यामुळे संबंधित जागेला सूज येते व त्यानंतर वेदना होऊ लागतात. त्याबरोबरच ज्या शिरेवर / नाडीवर दाब पडेल त्या भागात वेदना, चमका, जखडणे, मुंग्या येणे, बधीरपणा ही लक्षणे जाणवतात. ज्यावेळी सूज कमी होईल अशा वेळी काही जणात चकती पुनश्‍च स्वत:च्या जागेवर जाते तर काही जणांत तशीच राहते. दोन मणक्यातील सांध्यामधील अंतर कमी होते तसेच दोन मणक्याच्या मधील सांध्यापासून सूज येते. त्यामुळेच मणक्यांमधील हालचाल बिघडते.

कंबरेतील चकती सरकणे -

यालाच लंबर डिस्क प्रोलॉस असे म्हणतात. सरकलेल्या चकतीचा दाब नाड्यांच्या अथवा शिरांच्या मुळावर पडल्याने विविध लक्षणे उत्पन्न होतात.

लक्षणे -

खालच्या बाजूला कंबर दुखणे आणि कालांतराने कंबरेतून खाली संपूर्ण पायात कळा येणे. असा त्रास होतो. काही जणांत कंबरदुखी व पायातील कळा एकदमच सुरू होतात. साधारणपणे जड वजन उचलणे, गर्रकन वळणे या क्रियेनंतर अचानकपणे या वेदना सुरू झाल्याचे आढळते. काही वेळा या वेदना काही तासापासून अनेक किरकोळ कंबरदुखीच्या असणार्‍या वेदना कंबरेवर ताण आल्यावर जाणवत असतात. व कालांतराने कंबरदुखी वाढत जाते. जखडल्याच्या स्वरूपात काही जणांत तर चमकणे या स्वरूपात काही जणात जाणवत असतात. कंबरेच्या मध्य भागाकडून सुरू होणार्‍या वेदना एका अथवा दोन्ही खुबांकडे जाणार्‍या तर काही वेळा पायाकडे जाणार्‍या असतात. खोकल्यानंतर, ऊठ - बस करताना ताण पडल्यावर पसरत असतात. दुखावलेल्या नाडी अथवा शिरेच्या दिशेप्रमाणे त्या भागात सुया टोचल्या प्रमाणे होणे, स्नायू वेदना, मुंग्या इत्यादी तक्रारी देखील जाणवत असतात. चालताना कंबरेत किंचित एका बाजूला झुकले जाते तसेच पुढे वाकण्याची क्रिया देखील त्रासदायक ठरत असते.

जास्त काळ हा विकार राहिल्यानंतर मांडया अथवा स्नायुंची झीज होऊन त्यांचा आकार लहान झालेला असतो काही वेळा पायातील स्नायुची ताकद कमी झालेली असते.

मानेतील चकती सरकणे - सर्व्हायकल डिस्क प्रोलॅप्स-

मानेची चकती सरकणे हा प्रकार तुलनेने कमी प्रमाणात आढळून येतो. मान दुखणे, मान आखडणे, मान वळविताना त्रास होणे या तक्रारी आढळतात. मानेत सुरू होणार्‍या वेदना खांद्याकडे, दंडाकडे व तेथून हाताकडे पसरतात. काही वेळा या वेदना पाठीकडे जाऊ शकतात. हाताला मुंग्या येणे, हात जड होणे, हाताला बधीरपणा, ताकद कमी वाटणे, या तक्रारी कमी अधिक प्रमाणात जाणवतात.

चकती सरकण्यावरील उपचार -

चकती सरकणे या विकारात कंबरेला अथवा मानेला पूर्ण विश्रांती देणे हा सगळ्यात महत्त्वाचा उपचार असतो. आधुनिक शास्त्राप्रमाणे वेदनाशामक, सूज कमी करणारी औषधे, ट्रॅक्शन लावणे, असे प्रथमत: उपचार केले जातात याने पूर्ण आराम न मिळाल्यास शस्त्रकर्म केले जाते.

चकती सरकण्यावर वरदान सांघिक आयुर्वेदी उपचार -

अनेक वेळा आधुनिक औषधांनी पूर्णपणे आराम मिळत नसतो. अशा वेळी तसेच शस्त्रकर्म करणे शक्य नसते अशा वेळी आणि काही वेळा शस्त्रकर्म केल्यानंतर देखील तक्रारी पूर्णपणे बंद होत नाहीत. अशा रूग्णांना आयुर्वेदीय तत्वाप्रमाणे सांघिक आयुर्वेदीक उपचार केल्यास उत्तम फायदा होतो असा माझा 22 वर्षांचा अनुभव आहे. यासाठी सुरूवातीला रूग्णाच्या त्यांची तीव्रता त्या कधी वाढतात, कधी कमी होतात, इत्यादींची सखोल माहिती घेऊन आणि आयुर्वेदातील नाडी, प्रकृती इत्यादी अष्टविध परीक्षांनी रूग्ण तपासणी केली जाते. तसेच रूग्णाच्या एक्स रे, एम. आर. आय. यामधील दोषांचा अभ्यास करून उपचार ठरविले जातात. हे उपचार करताना औषधे, पंचकर्म व्यायाम, योगासने आणि वर्तणूकीतील बदल यांचा सांघिक उपयोग केला जातो.

आयुवेदातील गुडची, रास्ना, पुनर्नवा, दशमुळ, निर्गुडी, गोखरू, अश्‍वगंध, गुग्गुळ, कवचबीज, शतावरी, शृंग, कुकुटांडत्वक इ. भस्माच्या एकत्रिकरणातून तयार झालेली संयुक्त औषधे दिली जातात.

औषधाबराबरच पंचकर्म उपचाराला या विकारात महत्व आहे. विविध प्रकारच्या औषधी तेलाने मसाज, औषधी वाफेने अथवा तेलाने शेकणे, बस्ती, कटीबस्ती इ. चा अतिशय उत्तम उपयोग होतो. या बरोबरच रूग्णाच्या प्रकृतीप्रमाणे आहार, योग्य व्यायाम, योगासने, यांचेही मार्गदर्शन महत्वाचे आहे ॥ आर्यलोक॥ या आमच्या सातार्‍यातील सुसज्ज आयुर्वेदीक रूग्णालयात या पध्दतीने केल्या जाणार्‍या सांघिक उपचारांनी महाराष्ट्रातील अनेक रूग्ण वेदनामुक्त झाले आहेत.

थोडक्यात महत्वाचे -

मणक्यातील चकती सरकल्याचे निदान झाल्यावर घाबरून न जाता आयुर्वेदिक सांघिक उपचारांचा तज्ञांकडून अवलंब केल्यास उत्तम फायदा होतो.

डॉ. आनंद ओक, आयुर्वेदाचार्य


रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट