स्वातंत्र्यदिन निमित्त आरजे तेजस्विनी यांनी घेतलेली विशेष मुलाखत
न्यायाचे प्रहरी, कविमनाचे माणूस पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांची स्वातंत्र्यदिन निमित्त आरजे तेजस्विनी यांनी घेतलेली विशेष मुलाखत
15 ऑगस्ट - भारताचा स्वातंत्र्यदिन. देशाच्या सीमारेषेवर जवान आपल्या प्राणाची आहुती देतात, तर देशाच्या आत गुन्हेगारी, दहशतवाद, बॉम्बस्फोट याविरुद्ध लढणारेही वीर असतात. अशाच एका वीर, न्यायासाठी जीवन पणाला लावणाऱया पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांच्याशी मनमोकळा संवाद साधूया.
मुलाखतीच्या दिवशी, सभागृहात प्रवेश करताना माझ्या नजरेने त्यांचं स्मितहास्य टिपल. कोर्टात कठोर आणि निर्धाराने उभा राहणारा हा माणूस, विद्यार्थ्यांच्या गर्दीत अगदी शांतपणे बसलेला दिसला. त्या क्षणी मला जाणवलं - ही मुलाखत केवळ प्रश्नोत्तर नसेल, तर ती एक प्रवासकथा असेल.
तेजस्विनी: साहेब, पद्मश्री, झेड प्लस सिक्युरिटी असूनही तुम्ही इतके साधेपणाने, मनमोकळेपणाने भेटलात. या साधेपणाचं रहस्य काय?
अॅड. निकम: (हसत) पदव्या, सुरक्षा -या माझ्या कामाचे उपफळ आहेत. खरा सन्मान तो आहे जो लोकांच्या मनात असतो. आई-वडिलांनी साधेपणाचे संस्कार दिले आणि जळगावच्या मातीने ते घट्ट रुजवले.
तेजस्विनी: सरकारी वकील म्हणून कामकाज कसं असतं?
अॅड. निकम: "सरकारी वकिलाचं काम फक्त कोर्टात युक्तिवाद करणं नसतं. ते एक संपूर्ण टीमवर्क असतं - पोलीस तपास करतात, सरकार मार्गदर्शन करतं आणि आम्ही न्यायालयात पुरावे सादर करतो. उलट तपासणी करताना गुन्हेगाराची खरी मानसिकता उघड करणं हे सर्वात महत्त्वाचं. अनेकदा त्या संवादातूनच आरोपीला आपल्या गुह्याची जाणीव होते.
टाइमलाइन - आयुष्याच्या मोठ्या खटल्यांची झलक
- 1993 - मुंबई बॉम्बस्फोट खटला; 250+ मृत्यू, 700+ जखमी.
- 2008 (26/11) - मुंबई दहशतवादी हल्ला; 166 मृत्यू, 300+ जखमी.
- 2010 - अजमल कसाब दोषी ठरला; फाशी सुनावली.
- 2016 - पद्मश्री सन्मान प्राप्त.
तेजस्विनी: 1993 चा बॉम्बस्फोट आणि 26/11 चा हल्ला - या दोन्ही खटल्यांत तुमचा अनुभव कसा होता?
अॅड. निकम: "1993 चा बॉम्बस्फोट - मुंबईसाठी तो काळ असह्य वेदनेचा होता. प्रत्येक पुरावा जणू काचेचा तुकडा - जपून हाताळावा लागला. तर 26/11 च्या हल्ल्यात, अजमल कसाबला दोषी ठरवणं ही फक्त कायदेशीर नव्हे तर राष्ट्रीय सन्मानाची लढाई होती. पाकिस्तानात जाऊन त्यांच्या खोटेपणाचा बुरखा फाडणं - हे माझ्या कारकिर्दीचं अभिमानास्पद पान आहे.
26/11 च्या खटल्यादरम्यान, पुरावे गोळा करण्यासाठी आम्ही आणि तपास पथकांनी अनेक रात्र जागून काढल्या. कोर्टात दाखल होण्राया प्रत्येक दस्तऐवजाच्या मागे तासन तास पडताळणी, भाषांतर, तांत्रिक तपासणी झाली. हा भाग लोकांना दिसत नाही, पण हाच न्यायप्रक्रियेचा कणा असतो.
देशभक्ती केवळ सीमा राखण्रायांत नाही, तर न्यायासाठी लढण्रायांतही तितकीच असते. अॅड. उज्ज्वल निकम
तेजस्विनी: लोक म्हणतात - कोर्टात तुम्ही कठोर, पण बाहेरच्या जगात मृदू आणि कवी मनाचे..
अॅड. निकम: (डोळ्यात हलकी चमक) होय, कोर्टात मी कठोर असतो कारण तिथे माझा धर्म न्याय आहे. पण आयुष्यात मला कविता, गाणी आणि नातवंडांसोबत वेळ घालवायला आवडतो. माझ्या पत्नी ज्योतीताई, आई-वडिलांचे संस्कार, आणि जळगाव - हे माझं आधारस्थान आहे."
तेजस्विनी: कोर्टातील एक लक्षात राहिलेली घटना?
अॅड. निकम: एका खटल्यात, आरोपी उलट तपासणीत एवढा कोलमडला की शेवटी म्हणाला - ‘सर, मी खरंच चुकीचं केलं.' त्या क्षणी जाणवलं - शिक्षा ही फक्त न्याय देण्यासाठी नसते, ती माणसाला सुधारणारी असते.
तेजस्विनी: कायदे शिकण्राया विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?
अॅड. निकम: कायदा हा केवळ पुस्तकातील ज्ञान नाही, तर न्याय देण्याची कला आहे. सचोटी, अभ्यास, आणि संयम - हे तीन गुण असतील तर तुम्ही मोठे वकील बनाल.
तेजस्विनी: नवीन युगातील गुन्हेगारीचे आव्हान?
अॅड. निकम: सायबर क्राईम ही आजची मोठी समस्या आहे. हॅकिंग, ऑनलाईन फसवणूक, डिजिटल पुरावे - नागरिकांनी सावध राहणं गरजेचं आहे. कायदा आणि तंत्रज्ञान या दोन्हींची माहिती ठेवणं आता काळाची गरज आहे.
तेजस्विनी: अॅड. उज्ज्वल निकम हे न्यायासाठी निर्भयपणे उभे राहणारे, कठोर युक्तिवाद करणारे, पण अंतकरणाने संवेदनशील; कवितेत रमणारे. त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगते - सत्य, सचोटी आणि सेवा या तिन्ही गोष्टी हातात असतील, तर कोणत्याही रणांगणात विजय मिळवता येतो. ही मुलाखत घेताना मला जाणवलं दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya