Breaking News
पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती
पावसाळ्यात केसांच्या अनेक समस्या उद्भवतात आणि त्यापैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे केस गळणे. या ऋतूमध्ये अनेक जण केस गळतीमुळे त्रस्त असतात. पावसाळ्यातील दमट हवामानाचा थेट परिणाम आपल्या केसांवर होतो. टाळूतील ओलावा आणि घामामुळे लोकांना केसांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का की काही घरगुती उपायांनी तुम्ही केस गळती कमी करू शकता.
घाम आणि आर्द्रतेमुळे टाळू चिकट आणि निर्जीव होते
पावसाळ्यात घाम आणि आर्द्रतेमुळे टाळू चिकट आणि निर्जीव होते. ज्यामुळे केस गळतात. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे केसांची काळजी घेणारे उत्पादन वापरतात, तरीही केस गळती पूर्णपणे थांबत नाही.पुढे वाचा
केस गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही केस गळतीची समस्या सहज नियंत्रित करू शकता.
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेला कडुनिंब टाळू स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. तो कोंडा (डँड्रफ) आणि संसर्गाचा धोका कमी करतो. यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून थंड करून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवा.पुढे वाचा
दही (Yogurt)
केस गळतीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही दही आणि मधाचा वापर करू शकता. यासाठी दोन्ही गोष्टी मिसळून एक मिश्रण तयार करा आणि केसांना लावा. 30 मिनिटांनंतर केस धुवा.
खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल (Coconut oil or almond oil)
खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल गरम करून हलक्या हातांनी मसाज केल्याने रक्तभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) सुधारते आणि केसांशी संबंधित समस्या दूर होतात. हे केसांना मुळापासून मजबूत बनवते. त्यामुळे आंघोळ करण्यापूर्वी एक तास आधी या तेलाने केसांना मसाज करा.पुढे वाचा
शॅम्पूने केस धुवा ( Hair Wash)
पावसाळ्यातील ओलावा आणि घामामुळे टाळू चिकट होते. अशा परिस्थितीत, आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुवा. यामुळे सर्व घाण निघून जाईल आणि केस कमी गळतील.
फणी (Comb)
केस पूर्णपणे कोरडे झाल्यावरच त्यांना फणी करा. कारण ओल्या केसांना फणी केल्यास ते मुळापासून तुटू शकतात. यासाठी रुंद दातांच्या फणीचा वापर करा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे