NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अशी घ्या केसांची काळजी

अशी घ्या केसांची काळजी

महिला     

मुंबई -:तुम्ही कोणचा शॅम्पू वापरता आणि कोणत्या पाण्याने अंघोळ करता? तसंच तुमच्या त्वचेचा प्रकार यासह अनेक कारणं यामागं असतात. Does washing your hair every day cause hair loss?

अंघोळ करताना तुमचे केस अधिक का गळतात? त्यामागची कारणं, त्यापासून बचाव कसा करायचा? अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची त्वचातज्ज्ञ सुश्री राजेंद्रन यांनी उत्तरं दिली आहेत.

केस धुतल्यानं जास्त गळतात यात तथ्य नाही. डोक्यावरून अंघोळ करताना आपल्या काही सवयींमुळं केस गळत असतात. त्याशिवाय डोक्यावरून अंघोळ करण्याचा केस जास्त गळण्याशी तसा फारसा संबंध नाही.

तुम्ही आठवड्यातून किती वेळा डोक्यावरून अंघोळ करावी, हे व्यक्तीनुसार बदलत असतं.

जर केसांच्या मुळांमध्ये खूप तेल किंवा कोंडा अधिक राहत असेल तर दर दुसऱ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करावी.

जे लोक व्यायाम करतात आणि खूप घाम गाळतात, त्यात खेळाडुंचा समावेश आहे. त्यांनी रोज अशी अंघोळ करायलाही हरकत नाही

आपल्या त्वचेचा पीएच 5.5 (आम्लता) असतो. अशा शॅम्पूचा वापर करणं अधिक उपयोगी आहे, जो आम्लतेच्या समान स्तराच्या खूप जवळ असेल.

खूप जास्त आम्लता असल्यास केस कोरडे होऊ शकतात. शॅम्पूच्या पीएचबाबत बाटलीवरच माहिती दिलेली असते.

महिलांमध्ये आयर्नची कमतरचा असू शकते. हिमोग्लोबिनशिवाय रक्तात आयर्न किती आहे, हेही पाहायला हवे. व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळंही केसगळती होऊ शकते.

थायरॉइडची समस्याही कारणीभूत ठरू शकते. व्हिटामिन बी-12 ची कमतरताही होऊ शकते. या पोषक तत्वांसाठी सप्लिमेंट घ्यावे.

फक्त बायोटिनच्या गोळ्या केस गळती रोखू शकत नाहीत.

झिंक, सेलेनियम आणि मॅग्निशियमची कमतरता हेदेखिल याचं कारण आहे. सुका मेवा आणि बीयांचं सेवन करावं. भोपळ्याच्या बीया, बदाम, काजू हे खावं.

प्रत्येक आहारात प्रोटिनचा समावेश करावा. शाकाहारींनी सोया, पनीर आणि दही खावं. मांसाहारी असल्यास अंडी प्रोटीनचा चांगला स्त्रोत असतात.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट