मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

हाथरसमधील दुर्दैवी घटना

हाथरसमधील दुर्दैवी घटना

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे स्वतःला ईश्वराचा दूत मानणाऱ्या भोलेबाबाचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन त्यात १२१ जणांचा बळी गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. तर अनेक लोक जखमी झाले. भोले बाबा हे हाथरस आणि आजूबाजूच्या परिसरात धर्मोपदेशक म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच, दीर्घकालीन आजार बरे करणे, लोकांच्या समस्या सोडवणे आदी गोष्टींमुळे त्यांच्याकडे अनुयायांची गर्दी वाढत आहे. हे भोलेबाबा मृत व्यक्तींना जिवंत करण्याचा दावा करतात, पण सदर घटना घडल्यापासून हे ईश्वराचे तथाकथित दूत फरार झाले आहेत. जगात असे अनेक बाबा - बुवा आहेत, तसेच देवी, माता आहेत. लोक अशा भोंदूच्या नादी लागतात आणि अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. आपले स्वत्व गमावून दुसऱ्याला शरण जाणे ही मानसिकता वाईटच !  

             या भोले बाबांनी २००० साली असाच चमत्कार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. मृत झालेल्या एका मुलीला जिवंत करण्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह ठेवून घेतला होता. परंतु, नंतर हा खटला बंद करण्यात आला. १९९० च्या दशकात उत्तर प्रदेश पोलीस खात्यातून बाहेर पडल्यानंतर कासगंज येथील कॉन्स्टेबल सूरज पाल हे धर्मोपदेशक बनले. त्यांनी मोठ्या प्रमाणात अनुयायी गोळा केले. दलित कुटुंबे, मजूर, गवंडी, शेतमजूर आदी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांमध्ये या बाबांचा दबदबा आहे. 

                 भोले बाबा हे दलित कुटुंबातील असल्याने तळागाळातील मागासवर्गीय लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. विशेष म्हणजे ते कोणतीही दक्षिणा किंवा प्रसाद मागत नाही. खोटे बोलू नका, मांस-मासे-अंडी खाऊ नका, मद्यपान करू नका, असे ते त्यांच्या अनुयायांना सत्संगातून सांगतात. सत्संगाच्या शेवटी भोले बाबा म्हणाले की, आज प्रलय येणार आणि मग खरंच प्रलय आला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या सत्संगाला ४० ते ७० वयोगटातील नागरिक उपस्थित होते. भोले बाबांच्या पायाची धूळ अंगावर किंवा डोक्यावर लावली तर सर्व आजार बरे होतात, असा त्यांच्या अनुयायांचा विश्वास आहे. हे भोलेबाबा समाजात अंधश्रद्धा पसरवत असल्याचे दिसते. पण यांच्यावर कारवाई होत नाही, अशी व्यवस्था आपल्या देशात आहे. त्यामुळे अशा भोंदूचे फावते. सत्संग कार्यक्रमातून भोले बाबा निघाले तेव्हा त्यांच्या पायाची माती डोक्याला लावण्याच्या अंधश्रद्धेपायी गर्दी झाली होती. परिणामी चेंगराचेंगरी झाली आणि दुर्घटना घडली.

                 सलग सातवेळा या भोलेबाबाच्या सत्संगाला उपस्थित राहिला तर तो व्यक्ती सेवेदार होऊ शकतो. सेवेदाराचा खास गुलाबी ड्रेस असतो. स्त्रिया पुरुष गुलाबी रंगाचा गणवेश घालतात. भोलेबाबाच्या सत्संगात अंधश्रद्धेपायी भाविकांची चेंगराचेंगरी होऊन त्यात १२१ जणांचा बळी गेला आहे. मृतदेहांचे खच पाहून एका पोलिसाला हृदयविकाराचा झटका येऊन तो मृत्युमुखी पडला. पण भोलेबाबाला कसलेच दुःख झालेले नाही. आता या प्रकरणावर भोलेबाबा उर्फ नारायण सरकार हरि याने प्रतिक्रिया दिली आहे की, जे काही घडले त्याचा मला खेद वाटतो आहे. परंतु असे म्हणून मृत पावलेले लोक पुन्हा परत येणार नाहीत. किंवा मृतदेह जिवंत करण्याचा दावा करणारा भोलेबाबा दुर्घटनेतील कुणा मृत व्यक्तींना जिवंत करणार नाही. अशा अचाट दावे करणाऱ्या भोंदू मंडळींच्या भजनी लोकांनी लागू नये हेच खरे ! 

                भोले बाबांवर अंधश्रद्धा ठेवून या कार्यक्रमाला हजारो लोक आले होते. भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळच्या नाल्यात पडले आणि दुर्घटना घडली. दुर्घटना घडल्यानंतर  भोलेबाबांनी एक पत्रक काढून, काही समाजकंटकांमुळे चेंगराचेंगरी झाली, असे म्हटले आहे. या दुर्घटनेप्रकरणी कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. तसेच दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहेत.

                 भोलेबाबाची एवढी प्रसिद्धी आहे की, त्यांना पाहण्यासाठी काही महिला खांबावर चढल्या होत्या. भोलेबाबांना पाहण्यासाठी ही  गर्दी झाली. ही घटना घडताच सिंकंदररावचे पोलीस प्रमुख आशिष कुमार यांनी वर्तविली. आग्रा येथील अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलिगडच्या विभागीय आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली असून चौकशी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातलगांना २ लाख रुपये व जखमींना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. पंतप्रधान साहाय्यता निधीमधूनही मृतांच्या नातलगांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केली आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या संत्सगाचा आयोजक नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा अद्यापही फरार आहे, असे उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी म्हटले आहे. भारतीय न्याय संहिता , २०२३ च्या कलम १०५, ११०, १२६, १२६ (२), २२३ आणि २३८ अंतर्गत भोलेबाबाचे मुख्य सेवेदार असलेले देवप्रकाश मधुकर आणि चेंगराचेंगरी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट