मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

वर्ल्डकप जिंकल्यानंतर शरद पवारकडून द्रविड गुरुजींचं कौतुक, आणि म्हणाले...

वर्ल्डकप जिंकल्यानंतर शरद पवारकडून द्रविड गुरुजींचं कौतुक, आणि म्हणाले...

पुणे: भारतीय संघाने शनिवारी रात्री बार्बाडोसच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्वेन्टी-20 विश्वचषकावर नाव कोरले होते. या विजयानंतर टीम इंडियावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पुण्यात बोलताना टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक केले. भारतीय संघाच्या या विजयात काहीजणांनी सर्जिकल स्ट्राईकसारखा चमत्कार दाखवला, कोणी चांगला झेल घेतला. या सगळ्यामुळे आपण विश्वचषक स्पर्धेतील (T 20 World cup) विजयाचा दुष्काळ संपवला, असे शरद पवार यांनी म्हटले. 

भारतीय संघाला अत्यंत उत्तम शिक्षक मिळाला. द्रविड यांची कामगिरी महत्त्वाची आहे. द्रविड यांनी दिलेले योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिलेले सल्ले यामुळे सामूदायिक यश मिळाले, असेही शरद पवार यांनी सांगितले. 

विराट कोहली आणि रोहित शर्माची ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती, शरद पवार म्हणाले...

विराट कोहली आणि रोहित शर्मा ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होत आहेत. दोन्ही खेळाडू अतिश्य उत्तम आहेत. फॉर्ममध्ये असतानाच रिटायरमेंट घेणं योग्य असते. दोघांचंही जागतिक क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे.  नव्यांना संधी मिळावी, माझ्या मते हा निर्णय योग्य. सचिन तेंडुलकर निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित  केले. या दोघांचा निर्णय बरोबर असून मी त्यांचं अभिनंदन करतो, असे शरद पवार यांनी म्हटले.

सुर्यकुमार यादवचं शरद पवारांकडून कौतुक

एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचं वेगळं स्थान होतं. अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केले. ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला. सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. जसप्रीत बुमरा  आणि सुर्यकुमार यादव चांगली कामगिरी केली, असेही शरद पवार यांनी म्हटले.

पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही: शरद पवार

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे यंदा पंढरीच्या वारीत पायी चालणार असल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालणार ही बातमी खोटी आहे.  पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते.  त्या ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे. पालखीच्या  स्वागतासाठी मी थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत  चालणार नाही तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट