मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विराट, रोहितनंतर आता रवींद्र जडाने केली निवृत्तीची घोषणा

विराट, रोहितनंतर आता रवींद्र जडाने केली निवृत्तीची घोषणा

: एकीकडे टी-20 विश्वचषकाच्या विजयामुळे भारतीय आनंदात न्हाऊन निघाले आहेत. पण या स्पर्धेच्या विजयानंतर टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या शिलेदारांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारताने तब्बल 17 वर्षानंतर जेतेपद पटकावल्यामुळे एकीकडे क्रिकेटप्रेमी आनंद व्यक्त करत आहेत. पण विराट, रोहितच्या या निर्णयामुळे तेवढीच नाराजी व्यक्त केली जात आहे. या दोन खेळाडूंच्या निर्णयानंतर आता क्रिकेट जगतातून आणखी एका खेळाडूच्या निवृत्तीचे वृत्त समोर येत आहे. या खेळाडून आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. रवींद्र जडाने केली निवृत्तीची घोषणा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मैदानात वाघासारखा वावरणारा रवींद्र जडेजा आहे. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट लिहून त्याने आपला हा निर्णय सार्वजनिक केला आहे. रवींद्र जडेजा असा काही निर्णय घेईल, याची कल्पना कोणालाही नव्हती. पण विश्वचषक हाती आल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. रविंद्र जडेजाने नेमकी काय घोषणा केली? काय म्हणाला? विराट कोहली, रोहित शर्मानंतर रवींद्र जडेजानं देखील टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुसाट वेगानं अभिमानानं धावणाऱ्या अश्वाप्रमाणं माझ्या देशासाठी मी माझं सर्वोत्तम देण्याचा नेहमी प्रयत्न केला. इतर फॉरमॅटमध्ये मी माझं सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. टी 20 वर्ल्डकप जिंकण हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. माझ्या टी 20 कारकिर्दीचं सर्वोच्च शिखर आहे. अनेक आठवणी, प्रोत्साहन अन् पाठिंब्यासाठी सर्वांना धन्यवाद, असं रवींद्र जडेजा म्हणाला. विराट कोहली आणि रोहित शर्माकडून निवृत्तीची घोषणा दरम्यान, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. जडेजाच्या अगोदर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं आहे. ते दोघेही क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये खेळत राहतील. टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना संपल्यानंतर या दोघांनाही आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती.

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट