NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांना पावसाचा फटका

पाणी शिरून लाखोंचे नुकसान

पेण : गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पडणार्‍या मुसळधार पावसामुळे सोमवारी पेण तालुक्यात पूर येऊन नदी व खाडी किनारी असणार्‍या गावांत पाणी घुसले. या पुराचा फटका पेण शहर व परिसरातील नदीकाठच्या गणेशमूर्ती कार्यशाळांना मोठ्या प्रमाणात बसून, तयार मूर्तींचे नुकसान झाले आहे.

पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, दादर, तांबडशेत, रावे, दादर या ठिकाणी शेकडो गणपतीमूर्ती कारखाने आहेत. मूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच पुराचे पाणी अनेक कारखान्यांत घुसल्याने शेकडो तयार मूर्ती भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कच्च्या स्वरूपात असलेल्या तयार मूर्ती पाण्यात भिजल्यामुळे आता त्या पुन्हा वापरता येणार नाहीत. त्यामुळे 100 टक्के नुकसान झाले आहे. भिजलेल्या मूर्तीच्या जागी नव्याने बनविणे अशक्य आहे. परिणामी यंदा गणपती मूर्तींचा तुटवडाही भासणार आहे. दरम्यान, आता पुरातून बचावलेल्या गणपतीच्या मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी जागादेखील शिल्लक नाही. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे मूर्ती दरवर्षीप्रमाने वितरीत होऊ शकल्या नव्हत्या. परिणामी विक्रीअभावी नुकसान झाले होते आणि आता पुराच्या पाण्यात मूर्ती भिजल्याने लाखोंचे नुकसान दिसत आहे. त्यामुळे मूर्तीकार चिंताग्रस्त झाले आहेत. राज्य शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट