मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

दिव्यांगांच्या समस्या सोडवणार

अपंग क्रांती संघटना शिष्टमंडळाची तहसीलदारांबरोबर चर्चा             

पनवेल : अपंग क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने संघटनेचे अध्यक्ष बी.जी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका तहसीलदार विजय तळेकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन दिव्यांगांच्या विविध समस्या व सबंधीत शासकीय योजना याबाबत सविस्तर चर्चा केली. शासनाच्या संजय गांधी निराधार योजने अंतर्गत जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देण्यात येईल, अंत्योदय रेशन धान्य योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र दिव्यांग कुटुंबांना लाभ मिळवून देण्यात येईल, तसेच ज्या दिव्यांग कुटुंबांत एक किंवा दोनच लाभार्थी असतील त्यांना शासकीय नियमानुसार अन्न सुरक्षायोजनेचा लाभ देण्याचे मान्य केले.

दिव्यांगांना उत्पन्नाचे दाखले देतांना सदर दाखले विनाविलंब व योग्य त्या प्रकारे देण्याचे मान्य करण्यात आले. तसेच एकाच कुटुंबांत एका पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असल्यास प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत पुर्ण लाभ मिळू शकतो. असे तहसीलदार तळेकर यानी स्पष्ट करून सांगितले. तसेच कार्यालयात दिव्यांगांच्या कामाला विशेष प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन ही देण्यात आले. यापुर्वी तहसील कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश करताना उंच पायर्‍यांमुळे दिव्यांग व्यक्ती, जेष्ठ नागरिक यांना चढ-उतार करणे कठीण जात होते. आता त्या पाय-या दिव्यांग व जेष्ठांनी चढण्यायोग्य सोयिस्कर बनविल्याबद्दल संघटनेतर्फे तहसीलदार याना धन्यवाद देण्यात आले. तसेच या मध्ये अजूनही सुधारणा करून कार्यालयाच्या आतिल बाजूने सोयिस्कर असा रॅम्प बनवून देण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले. यावेळी कार्यालयातील इतर अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी विलास फडके रायगड जिल्हा अध्यक्ष, बाळाराम रोडपालकर जिल्हा उपाध्यक्ष, अतुल रायबोले पनवेल तालुका उपाध्यक्ष, नवीन पनवेल विभाग प्रमुख उज्ज्वला नलावडे, दत्तात्रेय पाटील, रामा धर्मा कलोते, रविंद्र राठोड यांनी सुध्दा या चर्चेत सहभाग घेतला होता.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट