मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

धुतूम येथे शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

उरण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणास पूरक अशा ग्रामपंचायत धुतूम : निसर्ग ऋण शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. आयोटीएल कंपनीच्या सीएसार फंडातून रू 26,85,038 खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचे रायगड जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी पर्यावरण दिनानिमित मैदानाच्या सभोवताली वृक्षारोपण देखील केले. तसेच ग्रामपंचायतीने केलेले वृक्ष लागवड व जोपासना याबद्दल सरपंच व ग्रामपंचायतीचे कौतुक केले. 

यापूर्वी हा प्रकल्प पायाभूत सुविधा व ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत असा प्रोजेक्ट कार्यान्वित होता. याच्यात संपूर्ण कचर्‍याची विल्हेवाट लागत नसल्याने सरपंच रेश्मा ठाकूर यांनी आयोटीएल यांच्याकडे पाठपुरावा करून सीएसआरच्या माध्यमातून हा संपूर्ण शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारला आहे. या  कार्यक्रमाला सरपंच रेश्मा शरद ठाकूर, उपसरपंच सविता रुपेश ठाकूर, माजी उपसरपंच वैशाली किशोर पाटील, माजी उपसरपंच आशा महिंद्र ठाकूर, माजी उपसरपंच सदानंद विठ्ठल ठाकूर, तुकाराम ठाकूर, मेघनाथ ठाकूर, नंदेश ठाकूर, किशोर परब, पाटील डॉक्टर  शतसेच  ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रामपंचायत सदस्य शरद ठाकूर तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक विनोद मोरे यांनी केले. प्रोजेक्टची संपूर्ण माहिती देण्याचे काम साई खानोलकर लास ग्रीनचे डायरेक्टर यांनी केले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट