मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचा ‘संवाद सेतू’

पनवेल : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्यची निवडणूक प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने नुकतीच पार पडली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून शंभर टक्के मतदान सह प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. कोविड-19 च्या प्रतिकूल परिस्थितीत देखील निवडणुकी सारखी जटिल प्रक्रिया बिनचूकपणे पार पाडणे हे खरे तर आव्हानच होते. पण हे दिव्य कुठेही गडबड न होता लोकशाही पद्धतीने, निर्विवादपणे यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. 

नवनियुक्त राज्य कार्यकारिणीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचून संवाद साधण्यासाठी हितगुज करून त्याच्या समस्या विचार जाणून घेण्यासाठी संवाद सेतू या ऑनलाईन व्यासपीठाची संकल्पना मांडली.  ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून भौगोलिक अंतर नवीनतम विज्ञानाची कास धरून कमी करण्याचे व संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आपल्या सभासदांचा राज्य कार्यकारणी सोबत थेट संवाद घडवण्याचा व ‘संवाद सेतू’ सर्वप्रथम कार्यान्वित करण्याचा मान रायगड जिल्हा कार्यकारणीला मिळाला. 13 मे 2021 रोजी संवाद सेतूचे आयोजन करण्यात आले होते. सदर संवाद सेतूचा लाभ घेऊन जिल्ह्यातील पन्नासहून अधिक पुनर्नियुक्त माजी सैनिक यांनी राज्याध्यक्ष बाजीराव देशमुख यांचे सोबत थेट संवाद साधला. यावेळी सदर ऑनलाईन व्यासपीठावरून राजीव जामोदकर उपाध्यक्ष, संतोष मलेवार सरचिटणीस, दीपक पाटील चिटणीस, विवेक पांडे कोषाध्यक्ष यांनी देखील सर्व सभासदांना मार्गदर्शन केले. राज्याध्यक्ष बाजीराव देशमुख यांनी या संवाद सेतुमुळे सभासद व राज्य कार्यकारणी यांच्यातील वैचारिक दरी नष्ट होऊन सुसंवाद घडण्यास मदत झाली, तसेच सर्वसामान्य सदस्यांचे मत, विचार जाणून घेतल्याने संघटनेची पुढील वाटचाल निश्चित करण्यास तसेच सभासदांमध्ये विश्वास निर्माण करण्यास मदत झाल्याचे मत व्यक्त केले. यासभेसाठी प्रवीण पावसकर विभागीय अध्यक्ष, सोमनिंगा बिराजदार जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे नियोजन सोमनींगा बिराजदार अध्यक्ष, जिल्हा रायगड यांनी तसेच सूत्रसंचालन संतोष तावडे चिटणीस, जिल्हा रायगड यांनी केले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट