NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कळंबोलीत हवा गुणवत्ता केंद्र

नवी मुंबई : पनवेल, खारघर, तळोजा, कळंबोली या दक्षिण नवी मुंबईत सर्वाधिक वायुप्रदूषण असल्याचे निदर्शनास आले आहे. कळंबोली येथे हवा गुणवत्ता यंत्र बसविण्याचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे. ही यंत्रणा आणि त्याचा सकृतदर्शनी प्रदूषणाची मात्रा दाखविणारा फलक लावण्याची परवानगी पनवेल महापालिकेने मंडळाला दिली आहे. त्यामुळे महिन्याभरात हे हवा तपासणी यंत्र कळंबोलीत लावले जाणार आहे. 

टीटीसी औद्योगिक वसाहतीतील तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात हवा व पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्याचे दृश्य परिणाम पाच ते सहा किलोमीटर अंतरातील सर्व रहिवाशांना सोसावे लागत आहे. या प्रदूषणाने कासाडी नदीची नासाडी झाल्याचा आक्षेप लवादाने घेतला असून रासायनिक कारखान्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. काही वर्षांपूर्वी या भागातील बेवारस कुत्र्यांचे देखील रंग बदलले होते. त्यामुळे या भागात प्रदूषणाची मात्रा जास्त असल्याचे अनेक वेळा सिद्ध होऊनही साधा हवा गुणवत्ता यंत्र लावण्यात आला नव्हता. तळोजातील या प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास हा खारघर व तळोजा येथील नव्याने राहण्यास आलेल्या रहिवाशांना सुरू झाला आहे. संध्याकाळच्या वेळेस सुटणारी दुर्गंधी रहिवाशांना नकोशी झाली आहे. येथील वातावरण या पर्यावरण विषयक संस्थेने डिसेंबरमध्ये या भागातील प्रदूषणाचा एक अहवाल तयार केला आहे. 

त्यात या भागात पीएम 2.5 या हवा प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने केवळ सात तास या भागात चांगली हवा मिळत असून इतर 17 तास हवा प्रदूषित असल्याचे आढळून आले आहे. याच संस्थेने जानेवारीत खारघर मधील मोक्याच्या ठिकाणी अडकवलेली पांढरी कत्रिम फुप्फसे दहा दिवसात काळी पडली होती. त्यामुळे या क्षेत्रातील प्रदूषणाची तक्रार या संस्थेने प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण मंत्री, पनवेल पालिका यांच्याकडे केली होती. मंडळाने या तक्रारीची दखल घेऊन किमान हवा तपासणी यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील प्रदूषणाची पातळी आता नागरिकांनाही पाहता येणार आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट