पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्‍ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान…. Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भाववाढीतूनही आत्मनिर्भरता

शेतकरी आंदोलनाचा प्रश्न देशात अजूनही धगधगत असताना त्या आगीत तेल ओतले ते वाढत्या महागाईने. देशात आज पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडत असताना सरकार मात्र आपण काही करू शकत नसल्याचे सांगत असल्याने आता कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. सामाजिक प्रश्नांवर आंदोलन करणार्‍या लोकांनाच सरकारकडून  आंदोलनजीवी आणि परजीवी म्हणून हिणवले जात असल्याने यापुढे आंदोलनाचा मार्ग चोखाळावा कि नाही या विवंचनेत देश आहे. गेल्या 70 वर्षात मागील सरकारांनी पेट्रोल-डिझेलच्या परावलंबनातून देशाला का मुक्त केले नाही असा सवाल मोदींनी करून या भाववाढीला पूर्वीचे सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. म्हणजेच शेतकरी आंदोलनप्रमाणे सरकार या भाववाढी विरुद्धही कोणताही उपाय योजणार नसल्याचे सुचविले. त्यामुळे ‘‘बहोत हो गई  महेंगाई कि मार, अब-की-बार मोदी सरकार’’  म्हणून सत्ता मिळवलेल्या मोदींच्या या यु-टर्न मुळे हेच का ते अच्छेदिन म्हणून प्रश्न विचारण्याची वेळ जनतेवर आली आहे. दरवाढ करून देशाला आत्मनिर्भर करण्याचा मार्ग मोदीजींनीच दाखवून दिला आहे, त्यामुळे देशातील व्यापारी/ उद्योजक  हा मार्ग अनुसरून कसे व किती आत्मनिर्भर होतात आणि आत्मनिर्भरतेच्या जात्यात भरडली जाणारी जनता आत्मनिर्भरतेसाठी कोणता मार्ग स्वीकारते ते येणारा काळच ठरवेल. 

काही राज्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर बाकी राज्ये शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. तीच अवस्था आता डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरांची आहे. आधीच कोरोनाच्या माराने गलितगात्र झालेला मध्यमवर्ग या वाढत्या महागाईने पार मेटाकुटीला आला आहे. देशाची आर्थिक अवस्था अतिशय चिंताजनक असल्याने त्यातच कोरोनानेही मोदींप्रमाणे यु-टर्न घेतल्याने पुन्हा त्याचा फटका नोकरदार आणि कष्टकरी वर्गाला बसून त्यांचे कंबरडे मोडले जाईल. अनेक उद्योजकांंनी शेकडो कामगारांना कामावरून काढले आहे तर लाखो कामगारांच्या पगारात कपात केली आहे. देशवासियांना माय-बाप सरकारकडून अशावेळी मोठ्या अपेक्षा असताना  ‘निरो’ मात्र पश्चिम बंगाल राज्यात दोन महिन्यात येऊ घातलेल्या निवडणुकात ‘जुमल्यांची तुतारी आणि नगारा’ वाजवत फिरत आहे. गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच विरोधकांनी महागाई आणि शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केले आहे. मोदीं विरोधी वातावरण देशात तयार होऊ लागल्याने आणि त्याची प्रचिती पंजाब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आल्याने सरकार चिंतीत असल्याचे दिसू लागले आहे. 

ज्या मोदींनी दर वाढीचे खापर मागील सरकारवर फोडले तो काळ देशासाठी खरतर खडतर काळ होता. या कालावधीत देशात अनेक भागात कमी पाऊस पडल्याने शेतमालाचे उत्पादन कमी झाले होते. त्यातच जगाच्या बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल 160 डॉलर पोहचले. त्यावेळच्या सरकारने हि ‘नैसर्गिक’ महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी खूपच प्रयत्न केले. त्यावेळी आंदोलनजीवी विरोधी पक्षाने देशात मोठ-मोठी आंदोलने केली. योगासने शिकवून चरितार्थ चालवणार्‍या परजीवी बाबाने भाजपाला मतदान केल्यास देशात पेट्रोल-डीझेल 35 रुपयात मिळेल अशी वल्गना करून खूप टाळ्या मिळवल्या. टीव्हीवरील तारका स्मृती इराणी हिने गॅस सिलिंडर घेऊन केलेल्या आंदोलनजीवी अभिनयाची दाद देऊ तेवढी कमीच आहे. अनेक चित्रपट कलाकारांचे ट्विट हा त्या काळी चर्चेचा विषय होता. पण आंदोलनाच्या परजीवत्वातून सत्ता मिळवलेल्या आंदोलनजीवींचे आताची भुमिका फार काही वेगळी नाही. जे काँग्रेस काळात आंदोलनजीवी होते तेच आज सत्ताजीवी असूनही  महागाई रोखण्यास असमर्थ ठरले आहेत. 2011 ते 2014 या काळात महागाईवर बोलणार्‍या  परजीवींच्या तोंडाला ईडी, सिबीआय आणि एनआयए  यांनी अशी काही ठिगळ मारली कि त्यांची बोलतीच बंद झाली. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेलाच मोदींनी दाखवलेल्या आत्मनिर्भर मार्गावरून चालणे भाग आहे आणि मोदी सरकारवर अवलंबून न राहता लवकरात लवकर आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे.

गेल्या 6 वर्षाच्या कालावधीत मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेकडून 23 लाख कोटी रुपये पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरवाढीतून जमा केले आहेत. त्यात अजून भर पडली आहे ती 17% सबसिडी कपातीची. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याने देशातील बाजारात तेलाचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारला गेल्या 6 वर्षात पेट्रोल आणि डीझेलवर सबसिडी न द्यावी लागल्याने लाखो कोटींची बचत झाली आहे. लॉकडाऊन काळात जगात इंधनाचे दर कमी होत असताना भारतात मात्र हे दर वाढतच होते. मग हे दर चढे ठेवण्यात सरकारचा  हेतू जनकल्याणाचा आहे कि विशिष्ट उद्योगपतींना फायदा करून देण्याचा आहे याचे सार्वजनिक मंथन होणे गरजेचे आहे. काँग्रेस सरकारच्या काळात तेलक्षेत्रात खासगी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास मोकळीक देण्यात अली. देशात आज रिलायन्स, एस्सार सारखे उद्योग समूह खासगी पेट्रोलपंप चालवत आहेत. हे उद्योग समूह अरब देशातून कच्चे तेल आयात करून त्यावर प्रक्रिया करून ते देशात विकतात. ज्याप्रमाणे सरकारला या तेल विक्रीतून प्रचंड नफा होत आहे त्याच धर्तीवर या खासगी उद्योजकांनाही तेव्हढाच किंबहुना जास्त नफा होत असणार हे निश्चित. शिवाय पेट्रोलमध्ये प्रमाणापेक्षा ज्यास्त इथेनॉल मिसळून मिळणारा खाजगी उद्योजकांचा नफा किती असेल याची गणती न केलेली बरी. त्यामुळेच जगात लॉकडाउन आणि आर्थिक मंदी असताना देशातील ‘हम दो आणि हमारे दो’ च्या संपत्तीत 80% वाढ झाली. ज्या उद्योगपतींची मदत निवडणुकीच्या काळात घेतली त्याचे पांग तर या भाववाढीतून फेडले जात नाही ना अशीही शंका घेण्यास वाव आहे. म्हणून तर भारत पेट्रोलियम, इंडियन पेट्रोलियम सारख्या या देशाच्या नवरत्न म्हणून ओळखल्या जाणार्‍या तेल कंपन्या खरेदी करण्याचे संकेत ‘हम दो आणि हमारे दो’ कडून मिळत आहेत. देशातील सर्व निवडणूका आर्थिक बळावर जिंकणे किंवा विरोधी पक्षाचे आमदार खरेदी करून सत्ता मिळवणे हेच तर भाजपचे आत्मनिर्भरतेमागील गुपित नाही ना.

मोदींचे हे आत्मनिर्भरतेचे गुपित उघडे होण्याचे अनेक प्रसंग गेल्या काही वर्षात उद्भवले. प्रत्येक वेळी मीडिया आणि समाज माध्यमांवरील भाजपचे योद्ध्यांनी हे प्रसंग कुशलतेने निभावून नेले. प्रत्येक समस्येला देशभक्तीची लस टोचून आणि भावनिक मुद्द्यांत लोकांना गुंतवून वेळ मारून नेण्यास सरकार यशस्वी ठरले. हे शक्य झाले कारण हजारो वर्ष या भारतीयांच्या रक्तात भिनलेली गुलामगिरीची आणि व्यक्तिपूजेची परंपरा. अनेक संतांनी, सुधारकांनी या मानसिक गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढायचा सतत प्रयत्न केला.  परंतु आपण  शिकलो, विज्ञानवादी झालो असे  दाखवत असलो तरी काहीबाबींत अजूनही मागासले पण कवटाळून बसलो आहोत. देशाचा नागरिक म्हणून आपण स्वतः स्वतंत्रपणे कधी विचार करणार? देशात घडत असणार्‍या घटनांकडे डोळसपणे कधी पाहणार आणि त्याविरुद्ध आवाज उठवून देशाला आणि पर्यायाने समाजाला आत्मनिर्भरतेकडे कधी नेणार? पूर्वी हा समाज जाती-पंथात विखुरला  होता. हि जाती व्यवस्था जरी तूर्त मोडली असली तरी नवी जाती व्यवस्था विविध पक्षांच्या स्वरूपात उभी राहिली आहे आणि समाज त्यात पुन्हा विखुरला गेला आहे. या नवीन वर्णव्यवस्थेत शिवा-शिवी नसल्याने कोणीही कोणतीही जात सोयीस्कररीत्या स्वीकारण्यास मोकळा असतो हे या वर्णव्यवस्थेचे वैशिष्ट्य.

खरंतर समाजाने अशा जातिव्यवस्थेत न गुंतता जो राजकीय पक्ष लोकशाही मार्गाने लोक कल्याणाचे निर्णय घेत असेल अशा पक्षाला मतदान करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. पण शिकलासवरलेला समाज कोणत्याही पक्षाच्या ध्येय धोरणावर व्यक्त न होता ज्या पद्धतीने विशिष्ट व्यक्ती पूजेचा पुरस्कार समाजमाध्यमांवर करतो ते पाहिले कि जाणवते समाजाला अजून खूप काही आत्मसात करायचे आहे. शहाणपण हे स्व:नुभवातून येते असे म्हणतात पण, त्यासाठी मोठी किंमत स्वतःला मोजावी लागते. असे असेल तर हे शहाणपण येण्यासाठी आणि भारतीय समाज  सुदृढ, प्रगतिशील आणि उन्नत होण्यासाठी किती मोठी किंमत समाजाला मोजावी लागेल हे काळच ठरवेल. दुसर्‍याच्या आनंदातही आनंद असतो या उक्तिनुसार देशातील दरवाढीतून आपण ‘हम दो आणि हमारे दो’ ना मिळणार्‍या आत्मनिर्भरतेचा आनंद घेऊया... कारण तूर्त हेच आपले प्रारब्ध.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट