मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

रायगड जिल्ह्यासाठी 275 कोटींचा आराखडा मंजूर

अलिबाग ः रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी वर्षांसाठी 275 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. ग्रामीण रस्ते, शाळा, अंगणवाड्या दुरुस्तीच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासाठीचा हा विक्रमी विकास आराखडा असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या मर्यादेनुसार पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या जिल्हा नियोजन समितीने सन 2021-22 साठी 189 कोटी 64 लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर करुन शासनाकडे पाठवला होता. याखेरीज सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी अतिरिक्त 88 कोटी 65 लाख रूपयांची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारने रायगडकरांसाठी 270 कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. मागणीपेक्षा तब्बल 91 कोटी रुपयांचा जादाचा निधी रायगडकरांना मिळणार आहे. कोरोना आणि चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर हा जादाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील रस्ते, नादुरुस्त शाळा, अंगणवाड्यांच्या उभारणीसाठी हा निधी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होताना दिसतील, अशी अपेक्षा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नुकताच कोकण विभागाच्या जिल्हा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी रायगडसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांच्या प्रारुप आराखड्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला कोकणातील जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते.

2021-22 साठी जिल्हा नियोजन आराखड्यातील निधी :
ठाणे जिल्हा -  450 कोटी.
मुंबई उपनगर - 440 कोटी.
रायगड जिल्हा - 275 कोटी.
रत्नागिरी जिल्हा - 250 कोटी.
सिंधुदुर्ग जिल्हा - 170 कोटी.
पालघर जिल्हा - 175 कोटी.
मुंबई शहर    - 180 कोटी.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट