मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

खाजगीकरणाविरोधात जेएनपीटी कामगारांचे आंदोलन

पनवेल : केंद्र सरकारने जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णय विरोधात बुधवारी जेएनपीटी कामगारांनी जेएनपीटी प्रशासन भवनावर ‘पीपीपी हटवा जेएनपीटी कंटेनर टर्मिनल बचाव’ चा नारा देत प्रचंड मोर्चा काढला होता. पोलिसांनी हा मोर्चा कासव चौकात अडविल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले. जेएनपीटी कामगार एकता संघटना, न्हावा शेवा बंदर कामगार संघटना आणि जेएनपीटी वर्कर्स युनियन या संघटनांच्या माध्यमातून आयोजित या मोर्चात शेकडो कामगार सहभागी झाले होते. या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि रायगड चे खासदार सुनिल तटकरे आवर्जून उपस्थित होते.

बंदर हे शेतकर्‍याच्या त्यागातून व हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे. आपल्या सर्वस्वाची होळी करणार्‍या प्रकल्पग्रस्त जनतेच्या समस्या जैसे थे ठेऊन जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करून जेएनपीटी बंदरातील कर्मचार्‍यांना संकटात टाकणार्‍या केंद्रसरकार विरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे. देशातील सर्व बंदराच्या उत्पन्नापैकी केंद्र सरकारला 35 टक्के उत्पन्न एका जेएनपीटी बंदरातून मिळत असताना काही भांडवलदारांच्या फायद्यासाठी केंद्र सरकार जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करीत असेल तर ते शिवसेना कधीही सहन करणार नसल्याचे खासदार बारणे यांनी स्पष्ट केले. या खाजगीकरण प्रश्नाबाबत केंद्रीय बंदर विकास मंत्री मनसुख मालवीय यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केल्यावर जेएनपीटी बंदराच्या खाजगिकरणाचा कसलाही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आता बंदरच विकायला काढल्याने शिवसेना त्याला प्रखर विरोध करेल असे सांगून प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा बारणे यांनी यावेळी दिला. यावेळी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी केंद्र सरकारने शिवरायाच्या भूमीतील भूमीपुत्रांशी वाकडे घेऊ नका असे सांगून आता राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने कुठल्याही कामगारांविरोधी निर्णय घेऊ देणार नसल्याचे ठणकावून सांगितले. तसेच देशाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जेएनपीटी बंदराच्या पीपीपी धोरणा विरोधात महाविकास आघाडीचे सर्व खासदार केंद्र सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच जेएनपीटी बंदराच्या प्रशासन येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, दोन गावांच पुनर्वसन आणि रुग्णालयाचा प्रश्न न सोडविता खाजगीकरणाचा डाव आखत असतील तर दि.बा.पाटलांचा भूमिपुत्र हे कदापी सहन करणार नाही  अशा भूमिपुत्रांच्या मागे या पुढेही आम्ही राहणार आहोत असेही तटकरे यांनी सांगितले. 

यावेळी जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष तथा ट्रस्टी दिनेश पाटील,न्हावा शेवा बंदर कामगार संघटना जनरल सेक्रेटरी तथा ट्रस्टी भुषण पाटील, जेएनपीटी वर्कर्स युनियन जनरल सेक्रेटरी तथा माजी ट्रस्टी रवि पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगारांनी पीपीपी हटवा जेएनपीटी कंटेनर टर्मिनल बचावचा नारा दिला.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट