मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कासाडी नदीत रसायन सोडणार्‍यांना अटक

पनवेल ः कासाडी नदीपात्रात घातक टाकाऊ रसायन दोन टँकरद्वारे सोडणार्‍या स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हे घातक रसायन महाड औद्योगिक वसाहतीमधील ‘हायकल’ कंपनीतून आणण्यात आले होते.

नदीपात्र प्रदूषित झाल्याने येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. कळंबोलीतील गुरुद्वाराशेजारील नागरिकांनाही या प्रदूषणाचा त्रास जाणवू लागल्याने स्थानिक तरुणांनी नदीपात्र प्रदूषित करणार्‍यांवर गेल्या दोन आठवड्यांपासून पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी मध्यरात्री या नदीपात्रात दोन टॅँकर रिकामे करण्यात येत असल्याचे या तरुणांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित हा प्रकार रोखत टँकर चालकांना पकडले आणि कळंबोली पोलिसांच्या स्वाधीन केले. राम आशीष, राम सुख यादव, पवनकुमार यादव अशी या टँकर चालकांची नावे आहेत. टँकरच्या मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास तळोजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

याबाबत स्थानिक तरुण आणि पर्यावरणप्रेमींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, रात्रीच्या वेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता प्रदूषण मंडळाचे अधिकारी तळोजा पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणी तिन्ही टँकर चालकांविरोधात भादंसं 277, 278 पर्यावरण रक्षणाच्या कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट