गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जागतिक बौद्धिक संपदा दिन: बुद्धी, कल्पकता आणि सर्जनशीलतेचा सन्मान

जागतिक बौद्धिक संपदा दिन: बुद्धी, कल्पकता आणि सर्जनशीलतेचा सन्मान

मुंबई - संपदा, म्हणजेच संपत्ती.. जी आपल्याला स्थावर, जंगम मालमत्ता म्हणजे पैसे, सोनं नाणं, घर वगैरे अशी दृश्य स्वरूपात असलेली संपत्ती चटकन् लक्षात येते. मात्र बौद्धिक संपदा म्हणजे नक्की काय भानगड? हे अनेकांना माहितीच नसतं. निसर्गानं मानवाला काही विशेष बुद्धी वरदान म्हणून दिली आहे. आणि त्या बुद्धीच्याच जोरावर माणसाने इतर प्राण्यांच्या तुलनेत मोठी प्रगती केली.

संपूर्ण पृथ्वीवरच्या आयुष्यात उलथापालथ घडवली, इतकं करून थांबला नाही, तर त्या पलिकडे अवकाशातही झेपावला. माणसाच्या ह्या प्रगतीमागे कोण आहे? तर माणसाला मिळालेला मेंदू. ज्यातून, माणसानं ही स्वतःची सृष्टी निर्माण केली. आज आपल्याला दिसणारे जग, त्याआधी कधीतरी माणसाच्या डोक्यात जन्मलेले आहे, तिथे कल्पनेच्या रूपात असलेल्या ह्या जगाला माणसानेच मग मूर्त रूप दिले. पण ह्या दोन्ही गोष्टी करण्यासाठी, माणसाने जो बुद्धीचा वापर केला, ती म्हणजे त्याची बौद्धिक संपदा.

जर बौध्दिक संपदा नसेल, तर बाह्य, दृश्य स्वरूपातही संपदा निर्माणच होऊ शकणार नाही. हे झालं बौध्दिक संपदेचे महत्त्व. आता ही संपदा तर आपल्या मेंदूतच असते, मग तिचे संरक्षण करण्याची गरज काय? ती कशी कोणी हिरावून नेणार? तर ज्या सुपीक डोक्यातून नवनवीन कल्पना येतात, त्यातून उभ्या राहणाऱ्या वस्तू / वास्तू तर चोरीला, हिसकावल्या जाऊ शकतात. मात्र बौध्दिक संपदा नेता येत नाही. मग ज्या विशेष माणसांच्या कल्पनेतून हे सगळं अद्भुत जन्मलं, निर्माण झालं, त्यांना त्यांचं श्रेय सर्वार्थाने मिळायलाच हवं ना?हीच आहे बौद्धिक संपदा.. आणि त्याबद्दल जागृती, त्याचं संरक्षण करण्यासाठी हा दिवस !

यंदाच्या म्हणजे जागतिक बौध्दिक संपदा दिनाची संकल्पना आहे.. ” बौद्धिक संपदा आणि संगीत : बौद्धिक संपदेचा नाद समजून घ्या ” म्हणजेच, संगीता कलावंत,संगीतकार, गायक, गीतकार, अशा सर्वांच्या original कलाकृतींचे, संगीताचे संरक्षण करण्यासाठी आयपी अधिकार कायदा कसा उपयुक्त ठरतो, यावर ह्यात भर देण्यात आला आहे.

कला, मग ती संगीत असो किंवा चित्रकला, शिल्पकला किंवा इतर काहीही सृजन. ही त्या प्रतिभावंतांची समाजाला देणगी असते, आनंद देणारी असते. मात्र कलाकार मनस्वी असतो, अनेक दिवसांच्या विचारानंतर, मेहनतीनंतर त्याची कला सृजित होत असते. या कलेचा सन्मान होणं, त्याचा यथोचित मोबदला त्याला मिळणं आवश्यक असते आणि न्याय ही.

आजकाल पायरसी चे जग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तर कलेचीही बेमालूम कॉपी करते आहे. अशावेळी, या कलाकारांच्या कलेचं संरक्षण होण्यासाठी सर्वांनीच अधिक सजग राहण्याची गरज आहे. कलेच्या चोरीचे विपरीत परिणाम लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्याच दृष्टीने यंदा, भारतात आयपी उत्सव 2025 हा साप्ताहिक उत्सव साजरा करण्यात आला होता. देशभरात झालेल्या विविध कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी बौध्दिक संपदा म्हणजे काय, त्याचे महत्त्व आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना यावेळी सांगितल्या. बौद्धिक संपदेचे पेटंट म्हणजे काय? ट्रेडमार्क, कॉपीराइट काय असतो? तो कसा मिळवता येतो, हे ही समजावून सांगितलं. जेणेकरून कलावंतांना, उदयोन्मुख कलाकारांना आपल्या मूळ संगीतकला आणि इतर कलाकृतींचे संरक्षण करता येईल.

संशोधनं आपले आयुष्य अधिक सुखकर करण्यास मदत करतात, तर कला, साहित्य आपलं जगणं अधिक समृद्ध करतात. जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ह्या संपदेचा सन्मान सर्वांनीच राखावा, ती चोरून किंवा ओरबाडून घेऊ नये, तिची भ्रष्ट आवृत्ती तयार करू नये, इतकी समज, आणि संवेदना माणसात आली, तरीही हा दिवस साजरा करणे सफल झाले असं म्हणता येईल.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट