जनविश्वासावर उभी राहिलेली उमेदवारी : प्रभाग २०५ मध्ये सुप्रिया दिलीप दळवी यांचा संघर्षशील आणि लोकाभिमुख प्रचार
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मनसे युतीतर्फे प्रभाग क्रमांक २०५ मधून उमेदवारी मिळालेल्या सुप्रिया दिलीप दळवी यांनी आपला प्रचार केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता तो थेट जनतेच्या भेटीतून, अनुभवातून आणि विश्वासातून उभा केला आहे. झोपडपट्टी भागांपासून मध्यमवर्गीय वसाहतींपर्यंत, गल्लोगल्ली फिरत त्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेत असून त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची भूमिका ठामपणे मांडत आहेत.
“राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नाही, तर लोकांच्या दैनंदिन जीवनात उतरलेली संवेदनशील सेवा आहे,” अशी स्पष्ट भूमिका सुप्रिया दळवी यांनी प्रचारादरम्यान मांडली. पाणीटंचाई, गटारांची दुरवस्था, रस्त्यांची खराब अवस्था, स्वच्छतेचा अभाव, आरोग्य सुविधांचा प्रश्न, महिलांची सुरक्षितता तसेच युवकांच्या रोजगारासंबंधी अडचणी — या सर्व मुद्द्यांकडे त्यांनी विशेष लक्ष देत नागरिकांशी सविस्तर संवाद साधला.
या परिसरात गेली अनेक वर्षे कार्यरत असताना लोकांच्या समस्या केवळ नोंदवून न थांबता त्या प्रत्यक्ष मार्गी लावण्याचा अनुभव आपल्याकडे असल्याचे त्यांनी नमूद केले. “लोकांच्या प्रश्नांवर उपाय शोधताना मला खूप काही शिकायला मिळालं. कोणत्या समस्येवर कोणत्या प्रकारे तोडगा काढायचा, हे मला लोकांनीच शिकवलं,” असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले.
प्रचारादरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार आणि युवकांनी सुप्रिया दळवी यांच्याशी आपुलकीने संवाद साधत आपल्या व्यथा मांडल्या. “आम्हाला आमच्यातलीच, आमच्या दुःखाला समजून घेणारी प्रतिनिधी हवी आहे,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत यावेळी बदल घडवण्याचा निर्धारही मतदारांकडून व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्याचा वारसा, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि निखळ प्रामाणिकपणा ही सुप्रिया दळवी यांची प्रमुख बलस्थाने ठरत आहेत. “माझा संघर्ष हा माझ्यासाठी नाही, तर माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभाराचे स्पष्ट आश्वासन दिले.
शिवसेना (उबाठा) – मनसे युतीच्या माध्यमातून प्रभाग २०५ मध्ये जनतेचा विश्वास, आशा आणि अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणारी उमेदवारी म्हणून सुप्रिया दिलीप दळवी यांच्याकडे पाहिले जात असून, येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदार कोणता कौल देतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant