गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यातील पत्रकारांना मारहाण करणा-या दोषींवर कठोर कारवाई करावी

*मानवाधिकार आयोगाकडे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रने केली लेखी तक्रार*

मुंबई - महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांचे पत्रकार व वृत्त छायाचित्रकार तसेच चित्रवाहिनीचे रिपोर्टर व कॅमेरामन यांना आपले कर्तव्य पार पाडीत असताना त्यांना राजकीय पुढारी व त्यांचे हस्तक तसेच गुंडप्रवृत्तीच्या लोकांपासून होणा-या त्रासांचा सामना करावा लागत असतो.प्रसंगी मारहाणीलाही सामोरे जावे लागत असते.केवळ पत्रकार म्हणूनच नव्हे तर सामान्य माणूस म्हणून त्यांना असणा-या मानवी अधिकारांची अशा प्रवृत्तींकडून पायमल्ली होत असते.अशा मानवी अधिकारांचे हनन करणा-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रने मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष तसेच निवृत्त. न्यायाधीश मा.एम.बदर यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

    ८ डिसे़बर २०१९ रोजी महाराष्ट्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा संमत केला व पत्रकारासाठी अशाप्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र सरकार हे पहिले राज्य असल्याचे सांगत आपले ढोल बडवून घेतले. परंंतु या कायद्याची अंमल बजावणी करण्यात यावी असे नोटीफिकेशन सरकारने न काढल्यामुळे पत्रकारावर हल्ले करणा-यांवर कोणतीही कारवाई होत नाही परिणामी हल्लेखोर मोकाट सुटतात.यामुळे समाजात अशाप्रकारची प्रवृत्ती दिवसेदिवस बळावू लागली आहे.अशा प्रवृत्तींना आळा घालून मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ व महाराष्ट्र संघटन सचिव राजेंद्र साळसकर यांनी मानवी अधिकार आयोगाचे अध्यक्ष एम.बदर यांच्याकडे लेखी तक्रारी केली असून दोषींवर कारवाई करून हल्ला झालेल्या पत्रकारांसाठी न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

    गेल्या काही महिन्यांपासून पत्रकार, छायाचित्रकार व विशेषत: चित्रवाहिनीचे रिपोर्टर आणि कॅमेरामन यांच्यावरील हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.

    ६ सप्टेंबर रोजी साम टिव्हीचे पत्रकार विकास मिरगणे हे गणपती विसर्जनाचे वार्तांंकन करण्यासाठी गिरगाव चौपाटी येथे आपल्या टीमसह गेले असता गाडी पार्क करण्याच्या क्षुल्लकशा कारणावरून एपीआय श्री.शांताराम नाईक या पोलीस अधिका-याने पत्रकार मिरगणे यांच्या कानशिलात लगावली. एपीआय शांताराम नाईक यांनी कोणत्या अधिकाराने पत्रकार मिरगणे यांच्या कानशिलात लगावली.मिरगणे यांनी गाडी चुकीच्या जागी पार्क केली असल्यास जो काही कायदेशीर दंड आहे तो ते न आकारता पत्रकाराला मारहाण करणे कोणत्या कायद्यात बसते.याबाबत जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस व मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे लेखी तक्रार केली असून यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

  त्याचबरोबर २० सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजनासंबंधी साधु-महंतांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी नाशिक येथून त्र्यंबकेश्वर येथे काही पत्रकार गेले होते.त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणा-या भाविकांना टोल भरावे लागत असते.परंतु आपण पत्रकार आहोत आणि साधु-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी आलो आहोत असे सतत सांगूनही या टोल नाक्यावरील वसुली कर्मचारी काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते.हे पत्रकार वरिष्ठांना फोन करीत असतानाच टोल वसुली करणा-या गुंडप्रवृत्तीच्या कर्मचा-यांनी या पत्रकारांना गाडीच्या बाहेर ओढून , दगड, लाठ्या व लोखंडी रॉडने मारहाण करावयास सुरूवात केली.

  या हल्ल्यात झी24 चे योगेश खरे व पुढारी न्यूजचे किरण ताजणे, अभिजित सोनावणे आणि अन्य दोन पत्रकार यात जखमी झाले असून यातील पुढारी न्यूजचे पत्रकार किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तेथील अपोलो रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 राज्याच्या मुख्यंमत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई चे आदेश दिले असून याप्रकरणी चौघांना अटक झाली आहे.या गुन्ह्यात दोषींना अटक झाली असली तरी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचे २०१९ पासून नोटिफिकेशन निघालेले नसल्यामुळे दोषी व्यक्ती कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन काही दिवसात मोकाट सुटतील.

  तेव्हा या दोन्ही गुन्ह्यातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जेयुएमचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ व महाराष्ट्र संघटन सचिव राजेंद्र साळसकर यांनी मानवी अधिकार आयोगाचे अध्यक्ष एम. बदर यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट