NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

ही कंपनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून करणार व्यावसायिक उड्डाणे

ही कंपनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून करणार व्यावसायिक उड्डाणे

नवी मुंबई - भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात नवा टप्पा गाठत Indigo आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही ऐतिहासिक भागीदारी भारताला २०३० पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची विमानवाहतूक अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावेल.


इंडिगोची भव्य उड्डाण योजना

इंडिगो हे NMIA वरून व्यावसायिक उड्डाणे सुरू करणारे पहिले विमानतळ ठरेल. पहिल्याच दिवसापासून इंडिगो १८ दैनिक उड्डाणे (३६ एटीएम) सुरू करेल, जे १५ हून अधिक शहरांमध्ये जोडणी साधतील. पुढील विस्तारानुसार:

नोव्हेंबर २०२५: उड्डाणांची संख्या ७९ दैनिक उड्डाणे (१५८ एटीएम) होईल, ज्यामध्ये १४ आंतरराष्ट्रीय उड्डाणे असतील.

मार्च २०२६: दैनिक उड्डाणांची संख्या १०० (२०० एटीएम) पर्यंत वाढवली जाईल.

नोव्हेंबर २०२६: ही संख्या १४० दैनिक उड्डाणे (२८० एटीएम) पर्यंत वाढेल, ज्यामध्ये ३० आंतरराष्ट्रीय उड्डाणे असतील.

इंडिगोच्या या निर्णयामुळे भारतातील प्रमुख महानगरांशी नव्या विमानतळाची जोडणी प्रभावीपणे होईल. दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई यांसारख्या शहरांबरोबरच लंडन, दुबई, सिंगापूर आणि बँकॉक यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्थळांपर्यंतही सहज प्रवास शक्य होईल.

भारताच्या विमानवाहतूक क्षेत्राच्या वाढीला यामुळे मोठी चालना देणार असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीसाठी नव्या संधी निर्माण करणार आहे. विमानतळाच्या आधुनिक सुविधांमुळे प्रवाशांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोईस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट