मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग खुला

पनवेल : रविवारी संपुर्ण दिवस जनता कर्फ्यु असल्याने नागरिकांनीही त्याला उत्फुर्त प्रतिसाद दिला. मात्र सोमवारी सकाळी अचानकपणे बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी गर्दी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ कळंबोली येथे झाली होती. ही गर्दी टाळण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद केली होती. मात्र गर्दी ओसरल्याने पुन्हा एकदा द्रुतगती महामार्ग खुला करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तरी देखील मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. विशेषतः मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे वाहतूक पोलिसांचा लक्षात आल्याने पुण्याकडे जाणार्‍या वाहनांना कळंबोली येथेच रोखण्यात आले. यामुळे अनेक वाहनांना पोलिसांनी माघारी पाठविले. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक पोलिसांवर देखील मोठा ताण आला. वाहनांची संख्या कमी झाल्यावर पुन्हा एकदा द्रुतगती महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतुक उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले. कारण नसताना घराबाहेर पडून वाहतूक कोंडी करणार्‍या वाहन चालकांना यावेळी सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या वाहन चालकांनी घराबाहरे पडावे, असे अवाहनही त्यांनी केले आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट