‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुहूर्त ठरला! नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार? समोर आली तारीख!

मुहूर्त ठरला! नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार? समोर आली तारीख!

Navi Mumbai Airport Inauguration Update : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबई विमानतळ सुरू होणार असल्याची चर्चा आहे. परंतु आथा ते कधी कार्यान्वित होणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. विमानतळ सुरू करण्यासाठी लागणारी अंतिम तयारी टप्पायत असून लवकरच एका भव्य उद्घाटन सोहळ्याने हे विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरू होणार याबाबत राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मुंबई विमानतळाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सामंत यांनी नवी मुंबई विमानतळ सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून नवी मुंबई विमानतळाहून व्यवसायिक उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान गेल्या महिन्यात 25 जून रोजी विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही आमदारांनी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली होती. तेव्हा राहुल कुल यांनी देखील सप्टेंबरपर्यंत विमानतळाचे काम पूर्ण होईल असे सांगितले होते. तसेच नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबतचा अंतिम निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.

बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस वे, उपनगरीय रेल्वे आणि जलमार्गाची कनेक्टिव्हिटी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हे सध्याच्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी आणि या प्रदेशात हवाई वाहतूक सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हे विमानतळ सप्टेंबर अखेरपर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती आता अधिकृतरित्या समोर आली आहे. या विमानतळाहून मुंबईत सहज पोहोचता येणार आहे. अटल सेतू आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग हे या विमानतळाला मुंबईशी जोडणारे वेगवान मार्ग ठरणार आहेत. या विमानतळाला बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस वे, उपनगरीय रेल्वे आणि जलमार्गाची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, रायगडसह इतर महत्त्वाच्या शहरांना मोठा फायदा होणार आहे.

नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये

  • नवी मुंबई विमानतळाची क्षमता: या विमानतळाची एकूण क्षमता दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 3.02 दशलक्ष टन मालवाहतूक करण्याची असेल. पहिल्या टप्प्यात 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.8 दशलक्ष टन मालवाहतूक हाताळता येईल.
  • नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्हिटी: नवी मुंबई विमानतळाला बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस वे, उपनगरीय रेल्वे आणि जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असेल. यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आणि इतर महत्त्वाच्या शहरांतील प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल.
  • नवी मुंबई विमानतळामुळे रोजगार निर्मिती: या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती अपेक्षित आहे ज्यात कुशल आणि बिगर कुशल कामगारांसाठी संधी उपलब्ध होतील.
  • नवी मुंबई विमानतळाचीमुळे आर्थिक विकास: विमानतळामुळे मुंबई-पुणे-नाशिक आणि कोकण परिसरातील उद्योगांना चालना मिळेल, ज्यामुळे औद्योगिक विकास आणि गुंतवणूक वाढेल.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट