NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या २,६५२ सरकारी बहिणी ठरल्या अपात्र

लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या २,६५२ सरकारी बहिणी ठरल्या अपात्र

मुंबई - राज्य सरकारने मोठ्या उत्साहाने आणलेल्या लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातील लाखो माताभगिनींना आर्थिक आधार मिळत आहे, हे खरे असले तरीही अनेकजण याचा गैरफायदा घेतानाही दिसून येत आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. या योजनेत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा १,५०० रुपये मदत दिली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असते. त्यामुळे ते या योजनेस पात्र नाहीत. तरीही, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणतीही तपासणी न करता या योजनेचा लाभ घेतला.

योजनेत महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येत आहेत. मात्र, आता आर्थिक अडचणींमुळे सरकारला या योजनेत सुधार करावे लागत आहे. योजनेत अपात्र ठरलेल्या २,६५२ सरकारी कर्मचाऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यांनी घेतलेले ३.५८ कोटी रुपये सरकार परत घेणार आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारवर आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे सरकारने काही कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. IT विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही आकडेवारी आणखी वाढू शकते. कारण अजूनही सुमारे ६ लाख कर्मचाऱ्यांच्या नोंदी तपासणे बाकी आहे. राज्य सरकारचेकर्मचारी, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर आणि इतर महानगरपालिका तसेच सरकारी शिक्षकांचा यात समावेश आहे. या सर्वांच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत. या प्रक्रियेला वेळ लागेल, कारण आम्ही या सर्व संस्थांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड मागवले आहेत.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट