NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नागपूर येथील सहकारी पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा

नागपूर येथील सहकारी पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा

नागपूर :- सर्वसामान्यांकडून निवृत्तीनंतर मिळालेला अथवा इतर मार्गाने कमावलेला पैसा सुरक्षीत ठेवण्यासाठी बँकेची निवड केली जाते. परंतु नागपुरातील हजारो नागरिकांकडून इंदोरातील उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवलेला पैसा अडचणीत आला आहे. या संस्थेत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नागरिकांचा पैसा पाण्यात गेला काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून या प्रकरणात इंदोरा येथील उत्थान नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष आणि २० संचालकांसह एकूण २१ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लेखापरीक्षक नारायण गाढेकर यांच्या तक्रारीवरून ही कारवाई केली गेली आहे. लेखापरीक्षकाच्या अहवालानुसार, २०१९ ते २०२३ या काळात इंदोरा येथील उत्थान नागरी सहकारी पत संस्थेकडून सामान्य नागरिकांकडून एफडी आणि बचत योजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. परंतु ही रक्कम नियमांनुसार गुंतवणूकदारांना परत करण्यात आली नाही.

दरम्यान या प्रकरणात नागरिकांकडून तक्रार करण्यात आली. त्यानंतर सदर पतसंस्थेत घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे. त्यानुसार घोटाळ्यात सहभागी असलेल्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष महेंद्र जनार्दन राऊत आणि संचालक मंडळातील इतर २० सदस्यांची नावे समोर आली आहेत. या सर्वांनी एजंटांच्या मदतीने नागरिकांचा विश्वास जिंकला आणि त्यांच्याकडून पैसे जमा केले आणि नंतर ती रक्कम संस्थेऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी वापरली गेली. गुंतवणूकदारांना वेळेवर रक्कम न मिळाल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर घोटाळ्याचा प्रकार पुढे आला.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट