मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कोकणातल्या दिघी बंदराला केंद्राची मंजूरी

कोकणातल्या दिघी बंदराला केंद्राची मंजूरी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील दिघी येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाचाही समावेश आहे. दिघी औद्योगीक प्रकल्पासाठी ५ हजार ४६९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सरकार १२ औद्योगिक प्रकल्पांवर २८ हजार ६०२ कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे सुमारे १० लाख रोजगार निर्माण होतील. या प्रकल्पांमध्ये उत्तराखंडमधील खुरपिया, पंजाबमधील राजपुरा पटियाला, महाराष्ट्रातील दिघी, केरळमधील पलक्कड, उत्तर प्रदेशातील आग्रा आणि प्रयागराज, बिहारमधील गया, तेलंगणातील झहीराबाद, राजस्थानमधील पाली आणि आंध्र प्रदेशातील वरक्कल आणि कोपर्थी यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील दिघी औद्योगिक प्रकल्पाबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, त्यासाठी ६ हजार ५६ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे १ लाख १४ हजार १८३ नोकऱ्या निर्माण होतील. त्यांनी सांगितले की हे औद्योगिक विकास क्षेत्र मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. इतकेच नाही तर कोलाड रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटर आणि इंदापूर, माणगावपासून १० किलोमीटर अंतरावर आहे. येथून मुंबई विमानतळाचे अंतर १७० किलोमीटर आहे. या प्रकल्पापासून दिगी बंदर केवळ ५५ किलोमीटर अंतरावर आहे. बंदराप्रमाणे दिगी औद्योगिक क्षेत्राचे औद्योगिकीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही केंद्रीय मंत्र्यांनी दिली. 

केंद्रीय मंत्री म्हणाले की, या प्रकल्पासाठी २ हजार ३१३ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. यावर उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांतर्गत सुमारे ४२ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट