कोकणातल्या दिघी बंदराला केंद्राची मंजूरी
कोकणातल्या दिघी बंदराला केंद्राची मंजूरी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील दिघी येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाचाही समावेश आहे. दिघी औद्योगीक प्रकल्पासाठी ५ हजार ४६९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सरकार १२ औद्योगिक प्रकल्पांवर २८ हजार ६०२ कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे सुमारे १० लाख रोजगार निर्माण होतील. या प्रकल्पांमध्ये उत्तराखंडमधील खुरपिया, पंजाबमधील राजपुरा पटियाला, महाराष्ट्रातील दिघी, केरळमधील पलक्कड, उत्तर प्रदेशातील आग्रा आणि प्रयागराज, बिहारमधील गया, तेलंगणातील झहीराबाद, राजस्थानमधील पाली आणि आंध्र प्रदेशातील वरक्कल आणि कोपर्थी यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील दिघी औद्योगिक प्रकल्पाबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, त्यासाठी ६ हजार ५६ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे १ लाख १४ हजार १८३ नोकऱ्या निर्माण होतील. त्यांनी सांगितले की हे औद्योगिक विकास क्षेत्र मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. इतकेच नाही तर कोलाड रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटर आणि इंदापूर, माणगावपासून १० किलोमीटर अंतरावर आहे. येथून मुंबई विमानतळाचे अंतर १७० किलोमीटर आहे. या प्रकल्पापासून दिगी बंदर केवळ ५५ किलोमीटर अंतरावर आहे. बंदराप्रमाणे दिगी औद्योगिक क्षेत्राचे औद्योगिकीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, या प्रकल्पासाठी २ हजार ३१३ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. यावर उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांतर्गत सुमारे ४२ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya