NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेशमधील सरकारने मागितली हिंदूंची माफी

सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेशमधील सरकारने मागितली हिंदूंची माफी

ढाका - बांगलादेशात सध्या भीषण अराजकता माजली असून येथील अल्पसंख्यांक हिंदू समाजाला आंदोलक लक्ष करत आहेत. त्यामुळे तेथील हिंदू नागरिक जीव मुठीत धरून दिवस कंठत आहेत. धार्मिक कट्टरतावादी बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करू लागले आहेत. हिंदूंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत, हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांची त्यांची घरं पेटवली जात आहेत, मंदिरांची नासधुस-तोडफोड होत आहे. त्यानंतर अल्पसंख्याक हिंदूंनी देखील आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, बांगलादेशमधील हंगामी सरकारमधील गृह विभागाचे सल्लागार शखावत हुसैन यांनी मान्य केलं आहे की त्यांच्या देशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना सुरक्षा पुरवण्यात बांगलादेशी सरकार व सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली आहे. जनरल एम. शखावत हुसैन यांनी बांगलादेशमधील हिंदूंची माफी मागितली आहे. तसेच

शखावत यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगवर हिंसाचार पसरवण्याचा आरोप करत कारवाईचा इशारा दिला आहे. शखावत हुसैन यांनी बांगलादेशातील हिंदू समुदायाची माफी मागितली आहे. सरकार त्यांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याची खंत हुसैन यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “या सगळ्याला केवळ सरकारचं नव्हे तर येथील बहुसंख्याकांचा समुदाय जबाबदार आहे. तसेच आम्ही देखील आमचं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरलो आहोत. आता परिस्थिती आमच्या नियंत्रणात येत आहे. लवकरच स्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे.

बांगलादेशमधील नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून शपथ घेतली आहे. देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी आंदोलक करत होते. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मी सरकारचा सल्लागार म्हणून काम करेन, अशी ग्वाही मोहम्मद युनूस यांनी दिली होती. त्यानुसार ते बांगलादेशला परतले व त्यांनी देशाची धुरा हातात घेतली आहे.मात्र ते अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार अद्याप थांबवू शकलेले नाही. बांग्लादेशातील या स्थितीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

जनरल एम. शखावत हुसैन यांनी बांगलादेशमधील हिंदूंची माफी मागितली आहे. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगवर हिंसाचार पसरवण्याचा आरोप करत कारवाईचा इशारा दिला आहे. शखावत हुसैन यांनी बांगलादेशातील हिंदू समुदायाची माफी मागितली आहे. सरकार त्यांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याची खंत हुसैन यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “या सगळ्याला केवळ सरकारचं नव्हे तर येथील बहुसंख्याकांचा समुदाय जबाबदार आहे. तसेच आम्ही देखील आमचं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरलो आहोत. आता परिस्थिती आमच्या नियंत्रणात येत आहे. लवकरच स्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट