मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

रायगड जिल्ह्यातील १० यात्रेकरू अडकले केदारनाथ खोऱ्यात

रायगड जिल्ह्यातील १० यात्रेकरू अडकले केदारनाथ खोऱ्यात

अलिबाग - केदारनाथ खोऱ्यात मुसळधार पावसानंतर तसेच झालेल्या विध्वंसानंतर तिथे पर्यटन आणि देवदर्शनासाठी गेलेल्या नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टाना सामोरं जावं लागत आहे. गौरीकुंड ते सोनप्रयाग पर्यंतचा रस्ता उद्ध्वस्त झाल्यामुळे हजारो नागरिक अडकून पडले आहेत.

तिथल्या सरकार कडून कुठल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत,अशी त्याठिकाणी अडकलेल्या नागरिकांची तक्रार असून बदलत्या वातावरणामुळे ते घाबरून गेले आहेत. कुठल्याही प्रकारचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने कुटुंबाशी संपर्क साधणे कठीण होऊन बसले आहे. काल आलेल्या हेलिकॉप्टरने दिवसभरात १६ नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आले. आमचे इथे खाण्यापिण्याचे देखील हाल होतात. आम्हाला इथून सुरक्षित हलवा अशी याचना हे नागरिक करीत आहेत.

अडकलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील शेकडो नागरिकांचा समावेश आहे.

त्यात महाड येथील उद्योजक गोपाळ मोरे यांचाही समावेश आहे. महाडचे आमदार भरत गोगावले, विकास गोगावले यांनी आमच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले परंतु इथलं सरकार आणि प्रशासन त्याला प्रतिसाद देत नसल्याची तक्रार मोरे यांची आहे. गोपाल मोरे यांनी या भूसंकलनात खूप मोठी मदत करून नागरिकांना जीवदान दिले मात्र आता ते स्वतःच अडकून पडले आहेत.

या उत्सव समितीचे अध्यक्ष मेहर योगेंद्र रावत ही कोणती दखल घेत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील यात्रेकरू आता प्रचंड घाबरलेल्या मनस्थितीत आहेत आम्हाला लवकरात लवकर मदत करून सुटका करावी अशी मागणी करत आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील १० यात्रेकरू अडकले आहेत.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट