मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

हवामान बदलामुळे ४५ हजारहून अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

हवामान बदलामुळे ४५ हजारहून अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर  

मुंबई, - हवामान बदलासह मानवी भौतिक विकासासाठी केल्या कित्येत वर्षांपासून निसर्गचक्रात लुरु असलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातून ४५ हजार हून अधिक प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणविषयक एका आंतरराष्ट्रीय संस्थेने प्राणी आणि वनस्पतींबाबतची निरीक्षणे नोंदवली आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययूसीएन) नुकतीच धोक्यात आलेल्या प्रजातींची ताजी यादी जाहीर केली आहे. गेले काही वर्षे ही यादी जाहीर केली जाते.

‘कोपियापोआ कॅक्टी’ या नामशेष होणाऱ्या शोभेच्या वनस्पतीबाबतही काही निरीक्षणे नोंदविण्यात आली असून, या वनस्पतीचा बेकायदा व्यापार चालला असून, सोशल मीडियाद्वारे त्याबाबत प्रसिद्धी केली जाते, असे आढळले आहे. या प्रजातींपैकी ८२ टक्के प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. २०१३ मध्ये ही संख्या ५५ टक्के होती, असे अहवालात म्हटले आहे.

धोक्यात असलेले प्राणी, वनस्पती यांच्याबद्धल यात माहिती दिली जाते. या यादीमध्ये आता १,६३,०४० प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे सहा हजारांनी वाढ झाली आहे. चिलीच्या अटाकामा किनारपट्टीवरील वाळवंटातील कोपियापोआ कॅक्टी, बोर्नियन हत्ती आणि ग्रॅन कॅनरिया महाकाय सरडे या सजीवांना धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती ‘आययूसीएन’ने दिली आहे.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट