मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अण्णाद्रमुक, भाजप पुन्हा एकत्र ?

अण्णाद्रमुक, भाजप पुन्हा एकत्र ?

नवी दिल्ली - तमिळनाडूत वर्षभराने विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीसाठी अण्णाद्रमुक आणि भाजप हे पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अण्णाद्रमुकचे प्रमुख के. पलानीस्वामी यांनी एकत्र येण्याविषयी थेट उत्तर देण्याचे टाळल्याने संबंधित चर्चांना आणखीच खतपाणी मिळाले आहे.

अण्णाद्रमुकने मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपबरोबरची मैत्री तोडली. त्याचा फटका दोन्ही पक्षांना त्या

निवडणुकीत बसला. त्यामुळे पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र येण्याच्या उद्देशातून त्या पक्षांनी चाचपणी सुरू केल्याचे वृत्त आहे. त्याविषयीचा प्रश्न पत्रकारांनी पलानीस्वामी यांना विचारला. निवडणुकीसाठी अद्याप वर्षभराचा अवधी आहे. आताच अंदाजावर

आधारित प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. आणखी सहा महिन्यांनी आघाड्यांचे चित्र स्पष्ट होईल. इतर कुठला पक्ष नव्हे; तर केवळ द्रमुक आमचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी आहे. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला सत्तेवरून हटवणे हेच अण्णाद्रमुकचे एकमेव लक्ष्य आहे, असे ते म्हणाले. त्यांनी भाजपशी पुन्हा मैत्री करण्याबाबत होकारार्थी किंवा नकारार्थीही उत्तर दिले नाही. त्यामुळे अण्णाद्रमुकने मैत्रीचा पर्याय खुला ठेवला असल्याचे मानले जात आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट