NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

२८८ जागांवर महायुती संपूर्ण शक्तीने एकत्रित निवडणूक लढत आहोत…

२८८ जागांवर महायुती संपूर्ण शक्तीने एकत्रित निवडणूक लढत आहोत…

मुंबई, - अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक होईल असा प्रयत्न नक्कीच आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आमच्यामध्ये फारशी जागांची संख्या नाही. ९० ते ९५ टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार म्हणून उत्तम पध्दतीने काम सुरू झाले आहे. आज महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे आज संध्याकाळी होणार आहे. त्यामुळे २८८ जागांवर महायुती पूर्ण ताकदीने… संपूर्ण शक्तीने एकत्रित निवडणूक लढत आहोत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

आमच्या अपवादात्मक संख्या एबी फॉर्मसंदर्भात आहेत. अन्य ठिकाणी अपक्ष उमेदवार हे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील तर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहोत. एक – दोन दिवसात नाराजांची समजूत काढण्यात नक्कीच यशस्वी होऊ असेही तटकरे म्हणाले. देवळाली ही जागा राष्ट्रवादीची असून त्याठिकाणी सरोज अहिरे या आमच्या महायुतीच्या उमेदवार आहेत. हेमंत गोडसे यांच्या ज्या काही भावना असतील. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की ती समजूत काढण्यात यशस्वी होतील.

पवारसाहेबांच्या कुठल्याच वक्तव्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतानाच बारामतीची जनता सूज्ञ आहे. ३० वर्षात अजितदादांनी बारामतीत उभे केलेले प्रचंड काम बारामतीकर नव्हे तर पूणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र विसरू शकत नाही किंवा अनुभवत आहे. देशभर बारामती पॅटर्नचे कौतुक होत असते. त्यामधील अजितदादांचा जो सहभाग आहे तो सुज्ञ बारामतीकर ठरवतील की, कुणाला प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊ मात्र या विधानसभेत प्रचंड फरकाने अजितदादा निवडून येतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे कधी -कधी त्यांच्या पध्दतीने बोलत असतात. कधी ते विनोद करतात तर कधी मिमिक्री करतात त्यामुळे त्यांचे बोलणे त्याच अर्थाने घ्यावे. त्यापेक्षा काही वेगळे असेल असे मला वाटत नाही असा जोरदार टोला पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला.

कॉंग्रेसला लोकसभेला मिळालेले यश किती पध्दतीने डोक्यात गेलेले आहे आणि ते किती जमिनीवर यायला लागले आहे याचे चित्र म्हणजे कोल्हापूरमध्ये काल कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज माघारी घेतला असा खोचक टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट