मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लवकरच सुरु होतेय हॉंगकॉंग सिक्सेस ही अनोखी क्रिकेट स्पर्धा

लवकरच सुरु होतेय हॉंगकॉंग सिक्सेस ही अनोखी क्रिकेट स्पर्धा

देश विदेश    

मुंबई -:सात वर्षांनंतर हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस ही अनोखी स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. हाँगकाँग क्रिकेट सिक्स स्पर्धेचे नियम नियमित क्रिकेट सामन्यांपेक्षा खूपच वेगळे आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ खेळणार आहे. नुकतीच याबाबत घोषणा झाली. या स्पर्धेत कोणते भारतीय खेळाडू खेळणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. १ ते ३ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, नेपाळ, न्यूझीलंड, ओमान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि यूएई हे १२ संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचे अनोखे नियम

या स्पर्धेतील सामन्यात संघाला फलंदाजीसाठी फक्त ५ षटके मिळतात.

दोन संघांमधील सामन्यात, प्रत्येक संघात ६ खेळाडू खेळतात. एका संघाला खेळण्यासाठी ५ षटके मिळतात आणि नेहमीच्या क्रिकेट सामन्याप्रमाणे एक षटक ६ चेंडूंचे असते. पण अंतिम सामन्यात एका षटकात ६ चेंडूंऐवजी ८ चेंडू टाकले जातात. म्हणजे साखळी सामन्यात प्रत्येक संघ ३० चेंडू खेळतो, परंतु अंतिम सामन्यात संघ ४० चेंडू खेळतो.

विकेटकीपर वगळता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडू एक षटक टाकू शकतो. जर गोलंदाजाने वाइड किंवा नो-बॉल टाकला तर त्याला एक अतिरिक्त धाव नाही तर २ धावा मिळतात.

५ षटके पूर्ण होईपर्यंत संघाच्या ५ विकेट पडल्या तरी सहावा खेळाडू फलंदाजी सुरू ठेवू शकतो. म्हणजे एकटा फलंदाज फलंदाजी करू शकतो. अशा स्थितीत ५व्या क्रमांकावर बाद होणारा फलंदाज रनरची भूमिका बजावेल, पण एकही चेंडू खेळू शकणार नाही. जेव्हा संघाची ५ षटके पूर्ण होतात किंवा सर्व ६ फलंदाज बाद होतात तेव्हाच एक डाव संपतो.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट