मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भाज्यांची आवक वाढल्याने दरात घसरण

चार वर्षानंतर एपीएमसीत विक्रमी आवक

नवी मुंबई : दुसर्‍या श्रावण सोमवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घाऊक बाजारात वर्षातील उच्चांकी आवक झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये 840 गाड्यांची आवक झाल्याने भाजीपाला दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. जवळपास 4 वर्षांनंतर एवढी मोठी आवक बाजारात झाली आहे. परिणामी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली शिवाय 150 ते 200 भाजीपाला गाड्या बाजार आवारात पडून आहे.

श्रावणात दरवर्षीच भाज्यांना चांगली मागणी असते. भेंडी, हिरवी मिरची, पापडी, वांगी, घेवडा, सिमला मिरची, भुईमूग शेंग, वाटाणा आणि इतर भाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. तर जवळपास सर्व भाज्यांचे दर 10 रुपये किलोच्या खाली आले आहेत. दरवर्षी श्रावणात भाज्यांना मागणी वाढून दर सुद्धा चांगले मिळतात. मात्र, यावर्षी बाजारभावात घसरणच सुरु असल्याने व्यापारी देखील आवाक झाले आहेत. श्रावण मासात मोठ्या प्रमाणात शाकाहार घेतला जातो. त्यामुळे भाजीपाला आणि फळांना मागणी वाढून भाज्यांत दरात वाढ होत असते, मात्र यावेळी तसं घडलेलं नाही. भाजीपाला बाजारात शनिवारीही 620 गाड्यांची आवक झाली होती. आठवड्याचा शेवटचा दिवस असताना पुरेसे ग्राहक बाजारात न आल्याने कवडीमोल भावाने आज भाजीपाला विकावा लागला. जवळपास सर्वच भाज्यांचे दर 10 रुपये प्रतीकिलोच्या खाली आले होते.

भाजीपाला दर
टोमॅटो 8 रुपये, काकडी 8 ते 10 रुपये , भेंडी 4 ते 8 रुपये, दुधी 8 ते 10 रुपये, वांगी 10 रुपये, फ्लॉवर 6 रुपये, कोबी 6 रुपये, कारली 10 रुपये, मेथी जुडी10 रुपये, कोथांबीर जुडी 8 रुपये असा दर भाज्यांचा राहिला.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट