मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

तुर्भे परिसरातील समस्या सोडवा

सुरेश कुलकर्णींची आयुक्तांना निवदेनद्वारे मागणी

नवी मुंबई ः तुर्भे स्टोअर येथील माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची 11 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेट घऊन तुर्भे स्टोअर, इंदिरा नगर, गणपती पाडा, हनुमान नगर, आंबेडकर नगर यासह तुर्भे परिसरातील सर्वच भागांमध्ये काही महिन्यांपासून पाण्याची समस्या सोडविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले. 

गेल्या काही महिन्यांपासून या विभागात नियमित पाणीपुरवठा होत नाही. संबंधित अधिकारी वर्गाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तसेच ठाणे-बेलापूर रोड तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर येथील मुख्य रस्त्यावर उड्डाणपुल बांधण्यात यावा जेणेकरुन अपघाताचे प्रमाण कमी होईल. या परिसरातील नागरिकांना रोज ठाणे-बेलापूर मार्ग ओलांडावा लागत आहे. मागील कित्येक वर्षांमध्ये अनेक अपघात होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडले असून अनेकांना गंभीर दुखापत होऊन कायमचे अपंगत्व आले आहे. यात लहान मुलांपासून ते वृध्दांर्पयंतच्या नागरिकांचा समावेश आहे. 

दरम्यान, महापालिका प्रशासनाने सदर दोन महत्वाच्या प्रश्नांवर तातडीने लक्ष घालून नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात. अन्यथा संपूर्ण तुर्भे प्रभागातील नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील, असा इशारा सुरेश कुलकर्णी यावेळी सदर निवेदनातून दिला. तर आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाणी पुरवठा समस्या आणि उड्डाणपुलाचे बांधकाम याबाबत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट