मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मार्केटच्या पुनर्बांधणीचा लवकरच निर्णय

एपीएमसीची बाळासाहेब पाटलांकडून पाहणी 

नवी मुंबई ः एपीएमसीतील कांदा-बटाटा मार्केट 18 वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेने अतिधोकादायक ठरवले आहे. या मार्केटची पुर्नबांधणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, त्यावर आलेल्या सिडको आणि न्यायालयीन आणि व्यापार्‍यांच्या अडचणीमुळे या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नाही. सरकार लवकरच या मार्केटच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेणार असल्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 

मागील अनेक वर्षापासून मुंबई एपीएमसीतील अतिधोकादायक असलेल्या कांदा-बटाटा मार्केटची गुरुवारी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एपीएमसी अधिकारी, व्यापारी आणि संचालकांच्या सोबत पाहणी केली. त्यांनी पाचही मार्केटमधीब समस्यांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे शेतकरी व बाजार समितीचे संचालक व अधिकार्‍यांशी संवाद साधला. 2003 सालापासून एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मधील सात विंग्ज मधील 234 गाळे धोकादायक ठरवले गेले आहेत. यावेळी पणनमंत्र्यांनी या धोकादायक मार्केटच्या पुनर्बांधणीबाबत व्यापार्‍यांनी लवकर प्रस्ताव सादर करावा असे निदेर्र्श दिले. पुढच्या महिन्यात तातडीने कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरच या मार्केटच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्यातील सर्वच ठिकाणच्या बाजार समित्यांच्या शाखांमध्ये येणारे शेतकरी, व्यापारी व इतर घटक यांना एकत्र घेऊन बाजार समित्यांमधीब आर्थिक उलाढाल सरकार वाढविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. एपीएमसी मार्केटमधील सुरक्षा, इतर मूलभूत सुविधा देण्यासंदर्भात बाजार समितीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये संचालक मंडळ आणि पणन आणि सहकार मंत्री यांच्यामध्ये कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर पणन मंत्र्यांनी धोकादायक असलेल्या मार्गाची पाहणी करुन त्याबाबत न्यायालयीन आदेश आणि सिडको याबाबत तोडगा काढून तातडीने या मार्गाची पुनर्बांधणी कशी करता येईल यावर निर्णय देण्याची शक्यता आहे. हे मार्केट एल शेपमध्ये बांधून त्यामधून येणार्‍या निधीतून व्यापार्‍यांना गाळे बांधून देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी पणनमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक डक, प्रभारी संचालक दीपक देशमुख, अधिकारी आणि बाजार घटक उपस्थित होते. 

कोरोना काळात व्यापार पद्दती कोलमडल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. अशा काळात मार्केटला नवसंजीवनी देण्यासाठी सरकारने विविध योजनांची आखणी केली असून विशेष दोन हजार कोटींच्या पॅकेजची तयारी केली असल्याते मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट