मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

ऐरोलीतील नवीन मासळी बाजार हटविणार?

मच्छीमारांचे आंदोलन स्थगित

नवी मुंबई : दक्षिण मुंबईतून स्थलांतरित करण्यात आलेला मासळी बाजार नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वाराजवळ   ेेऐरोलीत मांडण्यात आला आहे. मात्र हा बाजार बंद करण्यात यावा यासाठी कोळी महासंघाच्या वतीने गुरुवारी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हे मार्केट हटविण्यासाठी मुंबई परिमंडळ सातचे पोलीस प्रयत्न करतील, असे आश्वासन देण्यात आल्याने रात्री दहा वाजता होणारे मच्छीमारांचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई (क्रॉपर्ड) मधील मासळी बाजार काही दिवसांपूर्वी मुलुंड-ऐरोली नाक्यावरील जुन्या जकात नाक्याच्या जागेत स्थलांतरित करण्यात आलेला आहे. घाऊक मासळीचा हा बाजार रात्री सुरू होऊन पहाटे आवरला जात असतो. या मासळी बाजारामुळे मुलंड, भांडुप, कांजूर मार्ग, ठाणे तसेच नवी मुंबईतील मासे विक्रेत्यांच्या व्यवसायावर गडांतर आलेले आहे. स्वस्त आणि मस्त मासळी घेण्यासाठी याभागातील नागरिक आता थेट या घाऊक बाजारात जात असल्याने मासे विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.

मुंबईतून आलेले हे मासळी विक्रेत्यामध्ये जास्तीत जास्त हे विनापरवाना धारक मासळी विक्रेते आहेत. त्यामुळे मच्छीमार विक्रेत्यांच्या व्यवसाय अडचणीत आला आहे. या मासळी बाजारामुळे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे हा बाजार हटविण्यात यावा अशी मागणी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी केली आहे. हा बाजार त्वरित हटवावा यासाठी त्यांनी गुरवारी रात्री दहा वाजता या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनात जास्तीत जास्त महिला मासळी विक्रेत्यांचा समावेश राहणार होता. हे आंदोलन होऊ नये यासाठी मुंबई परिमंडळ सातच्या पोलिसांनी हे आंदोलन न करण्याचा सल्ला दिला. यासंर्दभात पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निमाण होणार असल्याने पालिका अधिकार्‍यांशी बोलून तोडगा काढणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात हा मासळी बाजार हटविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. बाजार इतरत्र हटविणार असल्यास आंदोलन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे पाटील यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट